शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"विरोधी पक्षांच्या आघाडीत काँग्रेसचे 'विशेष स्थान' आहे पण..."; चिदंबरम यांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 17:41 IST

महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलल्याने काँग्रेसची सावध भूमिका

P Chidambaram, Congress vs BJP: पाटणा येथे विरोधी पक्षांच्या आघाडीची एक मोठी बैठक काही दिवसांपूर्वी झाली. त्यानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय स्फोट झाला. अजित पवार यांनी काही आमदारांच्या साथीने शरद पवारांच्या विचारांशी फारकत घेत, शिवसेना-भाजपाच्या सत्तेत प्रवेश केला. आता बंगळुरू येथे विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी रविवारी एक मोठं विधान केलं. "२०२४च्या लोकसभा निवडणुकीत विरोधक एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकतात. भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षांची एकजूट करून जी आघाडी तयार होत आहे, त्याचा प्रमुख चेहरा 'योग्य वेळी' उदयास येईल.

आम आदमी पक्षावर साधला निशाणा

माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम म्हणाले, "आम आदमी पक्षाने (आप) ज्या प्रकारे पाटणा येथील बैठकीत दिल्ली अध्यादेशाचा मुद्दा उपस्थित केला, तो 'दुर्दैवी' होता. प्रत्येक मुद्द्यावर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी योग्यतेच्या आधारे निर्णय घेतला जाईल. विरोधी पक्षांची अनेक समान उद्दिष्टे आहेत. कारण ते भाजप सरकारच्या सामाजिक आणि आर्थिक धोरणांच्या विरोधात आहेत. आर्थिक मंदी, वाढती महागाई आणि वाढती बेरोजगारी तसेच 'नागरिक स्वातंत्र्य कमी करणे' याबद्दल सारेच चिंतित आहेत. प्रसारमाध्यमांवरील दबाव, संस्था कमकुवत होणे आणि तपास यंत्रणांच्या गैरवापराबद्दलही सारेच चिंतेत आहेत. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसचे 'विशेष स्थान' आहे, पण असे असले तरी 'यावेळी त्याबद्दल बोलण्याची गरज नाही'. योग्य वेळी विरोधी पक्षाचा प्रमुख नेता कोण असेल, ते चित्र स्पष्ट होईल," असे विधान चिदंबरम यांनी केले.

गेल्या काही महिन्यांपासून, राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांच्या एकजूटीचे नेतृत्व राहुल गांधी करतील, असा सूर काँग्रेसकडून लावण्यात आला होता. तर, शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्याकडे या आघाडीचे नेतृत्व दिले जावे, असे काही पक्षांच्या नेतेमंडळीचे मत होते. पण राष्ट्रावादीतच फुटीची चिन्हं दिसल्याने आता, काँग्रेसनेही सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्य नेता कोण, या वादावर सध्या बोलणं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम यांनी बोलणं टाळल्याचे दिसत आहे.

'विरोधी पक्षांच्या जितक्या जास्त बैठका तितक्या चांगल्या'

चिदंबरम म्हणाले, "त्यांना सीमेवरील सुरक्षेच्या परिस्थितीबद्दल देखील चिंता आहे आणि या सामायिक चिंतेने सर्व पक्षांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विरोध करण्यासाठी एकत्र केले आहे. निवडणुका लक्षात घेता शक्य तितक्या वेळा सभा घेण्यास विरोधी पक्षांकडे पुरेशी कारणे आहेत. बेंगळुरू येथे होणारी बैठक निश्चितच उद्देशपूर्ण असेल. आम्हाला धीर धरावा लागेल आणि पुढील पावले काय टाकावी याचा शांतपणे विचार करावा लागेल."

टॅग्स :congressकाँग्रेसP. Chidambaramपी. चिदंबरमBJPभाजपाSharad Pawarशरद पवारArvind Kejriwalअरविंद केजरीवाल