शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

'काँग्रेस नेहमीप्रमाणेच संवेदनशील मुद्द्याच घाणेरडं राजकारण करतंय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 09:35 IST

काँग्रेस नेहमीप्रमाणेच संवेदनशील मुद्द्यावर घाणेरडं राजकारण करत आहे. येथील सभेसाठी मी पोहोचण्यापूर्वीच आपल्या अन्नदाता शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता

ठळक मुद्देकाँग्रेस नेहमीप्रमाणेच संवेदनशील मुद्द्यावर घाणेरडं राजकारण करत आहे. येथील सभेसाठी मी पोहोचण्यापूर्वीच आपल्या अन्नदाता शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.

भोपाळ - मध्य प्रदेशातील 28 जागांवर पोटनिवडणूक होत आहे, त्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींच्या प्रचार दौऱ्यांना गर्दी होत आहे. नेते मंडळींच्या सभांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या झडलेल्या फैरी ऐकण्यासाठीही मतदार एकत्र येत आहेत. यावरुन भाजपा नेते आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. भाजापा नेते ज्योतिर्रादित्य शिंदेंच्या सभेदरम्यान, एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यावर, ज्योतिर्रादित्य शिंदेंनी काँग्रेसवर हल्लाबोल करत स्पष्टीकरण दिलंय.   

खंडवा जिल्ह्यातील मंधाता विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते ज्योतिर्रादित्य शिंदे यांची सभा होणार होती. तत्पूर्वी या सभेला हजेरी लावलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेवरुन राजकारण तापल्याचं दिसून येतय. मंधाता विधानसभा मतदारसंघात भाजपाचे स्टार प्रचारक ज्योतिर्रादित्य शिंदे यांच्या सभेपूर्वी तेथील स्थानिक नेत्यांची भाषणे सुरु होती. यादरम्यान, एका 80 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर वयोवृद्ध आजोबांशेजारील खुर्च्या रिकाम्या झाल्या, लोकं तेथून निघून गेली. मात्र, तरीही नेतेमंडळींचं भाषण सुरूच होतं, असा आरोप काँग्रेसने केला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. आता, शिंदे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काँग्रेसला जशास तसे उत्तर दिलंय.    

काँग्रेस नेहमीप्रमाणेच संवेदनशील मुद्द्यावर घाणेरडं राजकारण करत आहे. येथील सभेसाठी मी पोहोचण्यापूर्वीच आपल्या अन्नदाता शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. कार्यकर्त्यांना तत्काळ या शेतकऱ्यास रुग्णालयात दाखलही केले होते. मी सभास्थानी पोहोचल्यानंतर मला या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. त्यावेळी, सर्वप्रथम मी अन्नदाता शेतकऱ्यांस श्रद्धांजली वाहत मौन धारण केले. माझ्यासाठी राजकारण हे समाजसेवेचं माध्यम आहे, आणि त्यासाठी मला काँग्रेसकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही, अशा शब्दात भाजपा नेते ज्योतिर्रादित्य शिंदेंनी काँग्रेसवर निशाणा साधला.

टॅग्स :FarmerशेतकरीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेMumbaiमुंबईcongressकाँग्रेस