शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
8
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
9
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
12
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
13
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
14
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
15
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
16
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
17
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
18
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
19
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
20
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP

काँग्रेस 26 जानेवारीपासून 'संविधान बचाव पदयात्रा' काढणार, बेळगावमधील बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 21:26 IST

काँग्रेसची संविधान बचाव पदयात्रा एक वर्ष चालेल.

Congress Yatra : आज बेळगावमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली. यात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस 26 जानेवारी 2025 पासून 'संविधान बचाओ राष्ट्रीय पद यात्रा' काढणार आहे. बैठकीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, 'भारत जोडो यात्रे'ने काँग्रेसला 'संजीवनी' दिली होती, हा काँग्रेसच्या राजकारणातील हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता. आम्ही 'भारत जोडो न्याय यात्रा'ही काढली. आता आम्ही एक वर्षाची 'संविधान बचाओ राष्ट्रीय पदयात्रा' काढणार आहोत.'

'ही यात्रा प्रत्येक राज्यात होणार असून, त्यात सर्व मुद्द्यांचा समावेश केला जाणार आहे. महात्मा गांधींनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. फेब्रुवारी ते नोव्हेंबर 2025, या काळात एकही बैठक होणार नाही, हे पक्ष संघटनेचे वर्ष असेल. आमचे ‘जय बापू जय भीम जय संविधान’ संमेलन सुरू झाले, ते पुढील वर्षभर सुरू राहणार आहे. एप्रिलमध्ये गुजरातमध्ये एआयसीसीचा कार्यक्रम आयोजित करू,' अशी माहिती त्यांनी दिली.

या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेस कार्यकारिणीत गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. यासोबतच लवकरात लवकर सामाजिक-आर्थिक जात जनगणना करण्याची मागणीही करण्यात आली. CWC ने वाढत्या किमतीबद्दल चिंता व्यक्त केली. अर्थसंकल्पात गरिबांना आर्थिक मदत आणि मध्यमवर्गीयांसाठी करात सवलत द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. CWC ने बांग्लादेशातील धार्मिक अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली.

भाजप सरकारच्या काळात महात्मा गांधींचा वारसा धोक्यात; सोनिया गांधींचे CWC ला पत्र

संविधानाचे रक्षण करण्याचा आमचा निर्धार : राहुल गांधीकाँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणतात की, बेळगाव येथे झालेल्या विस्तारित CWC च्या 'नवीन सत्याग्रह' बैठकीत आमचा नवा ठराव संविधानाच्या रक्षणासाठी समर्पित आहे. वरिष्ठ नेत्यांनी पक्ष मजबूत करण्याचे काम केले पाहिजे. काँग्रेसने आपल्या सगळ्यांना मजबूत केले. दिल्लीत बसता ते ठीक आहे, पण मोठ्या शहरातून बाहेर पडून जिल्ह्यांपर्यंत जावं लागेल. विचारधारेसाठी लढणाऱ्यांना पक्षात जागा द्यावी लागेल. आरएसएसकडे अजिबात वाहून घेतलेले कार्यकर्ते नाहीत. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा १० टक्के जास्त वाहून घेतलेले कार्यकर्ते आहेत. पण, आपण त्यांना स्थान देत नाहीये, असे राहुल गांधी म्हणाले.     

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा