नवी दिल्ली - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडीसाठी करण्यात येत असलेल्या मोर्चेबांधणीला आज मोठे यश मिळाले आहे. देश आणि देशातील लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षांनी एकत्र येण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.
राहुल गांधी-चंद्राबाबूंचे हातात हात, एकत्र लढणार भाजपाच्या विरोधात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 17:24 IST