शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसला सापडला 'स्मार्ट' मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 10:54 IST

तंत्रज्ञानाचा वापर करत काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची कोंडी करण्याची योजना आखली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने हायटेक प्रचार करत बाजी मारली होती. स्मार्टफोन, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत भाजपने काँग्रेसला धोबीपछाड दिला होता. आता याच तंत्रज्ञानाचा वापर करत काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची कोंडी करण्याची योजना आखली आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून मोदींनी दिलेली आश्वासने शोधा आणि मोदी किती यशस्वी झाले, हे तुम्हीच ठरवा, असे आवाहन काँग्रेसकडून लोकांना केले जाणार आहे.'२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी जनतेला काय काय आश्वासने दिली होती, याबद्दल स्मार्टफोनवर सर्च करण्याचे आवाहन काँग्रेसकडून करण्यात येईल. मोदींची आश्वासन किती फसवी होती, हे यामधून लोकांना समजेल,' असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने एका इंग्रजी संकेतस्थळाशी बोलताना सांगितले. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीआधीच्या सभा आणि रॅलींमध्ये काँग्रेसकडून ही रणनिती वापरली जाईल. 'मोदींची आश्वासने गुगल करा आणि ती कितीपत खरी ठरली हे तपासून पाहा', असे आवाहन काँग्रेसकडून केले जाणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मोदींना जनतेला 'अच्छे दिन' आणण्याचे आश्वासन दिले होते. मोदींच्या या आश्वासनांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अनेकदा खिल्ली उडवली आहे. आता यापुढे जाऊन पुढील निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधी लोकांना मोदींच्या आश्वासनांचे काय झाले हे गुगल करुन पाहा, असे आवाहन करणार आहेत. मोदींनी रोजगार, अर्थव्यवस्था, शेती, पायाभूत सोयीसुविधा, धार्मिक सलोखा, भ्रष्टाचार, काळा पैसा आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख अशी अनेक आश्वासने दिली होती. मोदी सरकारने ही सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत का?, हे गुगल करुन शोधण्याचे आवाहन काँग्रेसकडून केले जाणार आहे. या आवाहनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा काँग्रेस नेत्यांना आहे. यामुळे मोदींच्या आश्वासनांची नेमकी स्थिती काय आहे, हे लोकांना समजेल, असे काँग्रेस नेत्यांना वाटते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी