शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

Punjab Election 2022: “पंजाबला पाकिस्तानपेक्षा कॅप्टन अमरिंदर सिंगांकडून अधिक धोका”; काँग्रेसचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 10:46 IST

Punjab Election 2022: पंजाबमध्ये वेगाने घडत असलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले आहे.

ठळक मुद्देकॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून साडेचार वर्षे पंजाबचा विश्वासघातकॅप्टन अमरिंदर सिंग फक्त स्वतःचा, कुटुंबाचा आणि मित्रांचा विचार करतातकाँग्रेसची घणाघाती टीका

चंडीगड:पंजाबमध्ये वेगाने घडत असलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. काँग्रेससाठी दिवसेंदिवस परिस्थिती आव्हानात्मक होत चालल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Punjab Election 2022) पार्श्वभूमीवर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली असून, भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. यातच पंजाबला पाकिस्तानपेक्षा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून अधिक धोका असल्याची घणाघाती टीका पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर केली आहे. 

अमरिंदर सिंग यांनी लवकरच स्वतःच्या राजकीय पक्षाची घोषणा करू, असे सांगत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्यास भाजपसोबत जागावाटपाची आशा असल्याचा दावा केला होता. जोपर्यंत मी माझे लोक आणि राज्याचे भविष्य सुरक्षित करत नाही तोपर्यंत मी विश्रांती घेणार नाही, असेही ते म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना, कॅप्टन अमरिंदर सिंग फक्त स्वतःचा, कुटुंबाचा आणि मित्रांचा विचार करतात, असा टोला रंधवा यांनी लगावला.

साडेचार वर्षे पंजाबचा विश्वासघात

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी साडेचार वर्षे पंजाबचा विश्वासघात केला. अमरिंदर सिंग यांनी केवळ स्वतःचाच विचार केला. पंजाबला पाकिस्तानपासून नाही तर कॅप्टन अमरिंदर सिंग आणि त्यांच्या गद्दारीपासून धोका अधिक आहे, असा हल्लाबोल रंधवा यांनी केला आहे. दुसरीकडे, पंजाब विधानसभेच्या आगामी निवडणुकांत आपल्यासोबत युती करण्याच्या माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या सूचनेचे भाजपने स्वागत केले. सिंग हे देशभक्त असल्याचे सांगून, देशहिताला प्राधान्य देणाऱ्यांशी हातमिळवणी करण्यास आम्ही नेहमीच तयार असल्याचे भाजपने सांगितले.

दरम्यान, अमरिंदर सिंग हे देशभक्त आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय हितांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्याशी युती करण्यास भाजप तयार आहे. सिंग शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत नव्हे, तर त्यांच्या प्रश्नांबद्दल बोलत होते. आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहोत. वेळ येईल तेव्हा आम्ही एकत्र बसून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करू, असे भाजप सरचिटणीस आणि पंजाब प्रभारी दुष्यंत गौतम यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणPunjabपंजाबElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा