शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

दिल्लीच्या रणांगणात काँग्रेसला मित्रांचा धक्का! राहुल गांधी एकाकी; मित्रपक्ष ‘आप’कडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:43 IST

इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरेंचा 'आप'ला पाठिंबा जाहीर

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेची निवडणूक काँग्रेस पूर्ण ताकदीने लढताना दिसत आहे. या निवडणुकीत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे तिन्ही पक्ष विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा भाग आहेत.

अरविंद केजरीवाल कसे देशविरोधी आहेत, हे पत्रकार परिषदेत सांगणार असल्याचे काँग्रेसचे अजय माकन यांनी सांगितले होते. मात्र, राहुल गांधींनी अजय माकन यांना फोन करून पत्रकार परिषद अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. राहुल गांधी यांनी सहकारी पक्षांचे म्हणणे ऐकले. मात्र, त्यानंतरही ‘इंडिया’च्या सहकाऱ्यांनी काँग्रेसऐवजी ‘आप’ला दिल्ली निवडणुकीसाठी पाठिंबा दर्शविला, तर काँग्रेसचे म्हणणे आहे की, इंडिया आघाडीचे उद्दिष्ट २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे होते, जे पूर्ण झाले आहे.

केंद्रासोबत काम करू : फारूख अब्दुल्ला

  • ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार केंद्राशी लढणार नाही, तर जम्मू-काश्मीरमधील समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करेल, असे मत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे.
  • ‘इंडिया’मधील एकतेच्या चिंतेबद्दल ते म्हणाले की, ही आघाडी केवळ निवडणूक लढवण्यासाठी नाही, तर ती भारताला मजबूत करण्यासाठी आणि द्वेष दूर करण्यासाठी आहे. नॅशनल कॉन्फरन्सचा भाजपशी काहीही संबंध नाही. मात्र, स्थानिक समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारांना सहकार्य करण्याची जबाबदारी केंद्राची आहे.
टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMamata Banerjeeममता बॅनर्जीAkhilesh Yadavअखिलेश यादवAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल