शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

भाजपाच्या मुकाबल्यासाठी काँग्रेस आखणार रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 03:46 IST

भाजपच्या राजकीय धुव्रीकरणाच्या कटकारस्थानाने काँग्रेस चिंतित

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा धर्माच्या नावावर धुव्रीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपच्या राजकीय धुव्रीकरणाच्या कटकारस्थानाने काँग्रेस चिंतित असून भाजपच्या या रणनीतीचा कसा मुकाबला करायचा, याचा काँग्रेस गांभीर्याने विचार करीत आहे.माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठे नेते शकील अहमद यांनी भाजपच्या या रणनीतीवर टिप्पणी करताना म्हटले आहे की, काँग्रेससह देशापुढील हे मोठे आव्हान आहे. भारतात ब्रिटिश ज्या प्रकारे समाजात फूट पाडण्याचे उद्योग करीत होते, त्याचप्रमाणे भाजप फाटाफुटीचे राजकारण करीत आहे. धुव्रीकरण करणे सहज सोपे होईल, या विचाराने भाजपा हिंदूपुढे उभा करता येईल, असा मुस्लिम नेता भाजप शोधत आहे.भाजपच्या या रणनीतीबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी बोलावलेल्या बैठकीत काँग्रेसने तीव्र चिंता व्यक्त केली. या बैठकीला शशी थरूर, पी. चिदंबरम, आनंद शर्मा, पवन खेडा, प्रियंका चतुर्वेदी, राजीव गोडा, रणदीप सुरजेवाला, मीम अफजल, अभिषेक सिंघवी यांच्यासह ४० नेते उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीचा मुख्य मुद्दा लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या मुकाबल्यात काँग्रेसची रणनीती कशी असावा, हा होता. काँग्रेस रोजगार, शेतकऱ्यांच्या समस्या आणि सर्वसामान्य जनतेशी संबंधित मुद्दे उपस्थित करीत असते; परंतु भाजप धार्मिक मुद्दे उकरुन त्यावर पाणी फेरते, असे मत थरूर यांनी मांडले. २०१९ मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आहे. तथापि, आम्ही केवळ २५ टक्के क्षमतेने काम करीत आहोत; दुसरीकडे भाजप धुव्रीकरणाचे राजकारण करीत आहे, असे मत चिदंबरम यांनी व्यक्त केले. यावर पवन खेडा, संजय झा, राजीव त्यागीसह युवा प्रवक्त्यांनी आक्षेप घेतला. आम्ही सातत्याने भाजपच्या मुद्यांविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी संघर्ष करीत आहोत. तेव्हा आम्ही युवा प्रवक्ते जे काही म्हणातात त्याचा काहीही परिणाम होत नाही, असे म्हणणे उचित ठरणार नाही, असे मत युवा प्रवक्त्यांनी मांडले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाLoksabhaलोकसभा