शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

काँग्रेसच्या प्रवक्त्यांना टीव्हीबंदी; गैरसमज टाळण्यासाठी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 03:02 IST

चर्चेसाठी जाऊ नका : न बोलावण्याची वृत्तवाहिन्यांना केली विनंती

नवी दिल्ली : आपल्या पक्ष प्रवक्त्यांना कोणत्याही वृत्तवाहिनीवर बाजू मांडण्यासाठी पाठवायचे नाही, असा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. लोकसभा निवडणुकांतील पराभव आणि त्यानंतर पक्षाध्यक्षपद सोडण्याचा राहुल गांधी यांनी घेतलेला निर्णय या पार्श्वभूमीवर चुकीच्या पद्धतीने बाजू मांडली जाऊ नये वा प्रवक्त्याच्या वक्तव्यातून गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे समजते.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजीवाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. तसेच देशातील वृत्तवाहिन्यांनी व संपादकांनी चर्चेच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये पक्ष प्रवक्ते वा प्रतिनिधींना बोलावू नये, अशी विनंतीही काँग्रेसने केली आहे. तूर्त एका महिन्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतला आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी काही नेत्यांविषयी केलेली विधाने तशीच्या तशी वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा, असे बोलले जाते.

राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसच्या अनेक प्रदेशाध्यक्षांनीही आपले राजीनामे पक्षनेतृत्वाकडे पाठवले आहेत. राहुल यांनी पक्षाध्यक्षपद सोडू नये, असा आग्रह सर्वच नेते करीत आहेत. त्यासाठी नेत्यांनी तयार केलेला फॉर्म्युलाही राहुल यांनी फेटाळून लावला आहे. गेल्या तीन दिवसांत ते कोणाही नेत्याला भेटलेले नाहीत वा फोनवर बोललेले नाहीत. राहुल यांच्या राजीनाम्याचा विषय कसा हाताळायचा, याविषयी काँग्रेस नेतेच गोंधळात आहेत.

अशा वेळी काँग्रेसचे प्रवक्ते वा प्रतिनिधींनी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत चुकीची वा गैरसमज निर्माण करणारी विधाने केल्यास गोंधळात भर पडू शकते. ते टाळण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. राहुल यांनी किमान काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडेपर्यंत अध्यक्षपद सोडू नये, असा नेत्यांचा आग्रह आहे. पक्षसंघटनेत हवे ते बदल करता यावेत, यासाठी त्यांना खऱ्या अर्थाने सर्वाधिकार मिळावेत, अशी नेते व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शिवाय राहुल गांधी यांनीच लोकसभेत पक्षाचे नेतृत्व करावे, अशीही नेत्यांची इच्छा आहे.राहुल यांच्यासाठी धरणे, मोर्चेमात्र राहुल गांधी या सर्व बाबींविषयी बोलण्यात तयार नाहीत. ते स्वत: बोलायला तयार नसताना काँग्रेसचे प्रतिनिधी व प्रवक्ते यांनीही वृत्तवाहिन्यांवर जाऊ न काही बोलू नये, असा पक्षाचा निर्णय असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घ्यावा, असा सर्व राज्यांतील काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा आग्रह आहे. कार्यकर्ते ठिकठिकाणी उपोषण करीत आहेत, धरणे धरत आहेत. राहुल यांनी पक्षाध्यक्षपदी राहावे, यासाठी चेन्नई व पुडुच्चेरीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चेही काढले.

टॅग्स :congressकाँग्रेसMediaमाध्यमे