शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या प्रवक्त्यांना टीव्हीबंदी; गैरसमज टाळण्यासाठी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 03:02 IST

चर्चेसाठी जाऊ नका : न बोलावण्याची वृत्तवाहिन्यांना केली विनंती

नवी दिल्ली : आपल्या पक्ष प्रवक्त्यांना कोणत्याही वृत्तवाहिनीवर बाजू मांडण्यासाठी पाठवायचे नाही, असा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. लोकसभा निवडणुकांतील पराभव आणि त्यानंतर पक्षाध्यक्षपद सोडण्याचा राहुल गांधी यांनी घेतलेला निर्णय या पार्श्वभूमीवर चुकीच्या पद्धतीने बाजू मांडली जाऊ नये वा प्रवक्त्याच्या वक्तव्यातून गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे समजते.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजीवाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. तसेच देशातील वृत्तवाहिन्यांनी व संपादकांनी चर्चेच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये पक्ष प्रवक्ते वा प्रतिनिधींना बोलावू नये, अशी विनंतीही काँग्रेसने केली आहे. तूर्त एका महिन्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतला आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी काही नेत्यांविषयी केलेली विधाने तशीच्या तशी वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा, असे बोलले जाते.

राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसच्या अनेक प्रदेशाध्यक्षांनीही आपले राजीनामे पक्षनेतृत्वाकडे पाठवले आहेत. राहुल यांनी पक्षाध्यक्षपद सोडू नये, असा आग्रह सर्वच नेते करीत आहेत. त्यासाठी नेत्यांनी तयार केलेला फॉर्म्युलाही राहुल यांनी फेटाळून लावला आहे. गेल्या तीन दिवसांत ते कोणाही नेत्याला भेटलेले नाहीत वा फोनवर बोललेले नाहीत. राहुल यांच्या राजीनाम्याचा विषय कसा हाताळायचा, याविषयी काँग्रेस नेतेच गोंधळात आहेत.

अशा वेळी काँग्रेसचे प्रवक्ते वा प्रतिनिधींनी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत चुकीची वा गैरसमज निर्माण करणारी विधाने केल्यास गोंधळात भर पडू शकते. ते टाळण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. राहुल यांनी किमान काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडेपर्यंत अध्यक्षपद सोडू नये, असा नेत्यांचा आग्रह आहे. पक्षसंघटनेत हवे ते बदल करता यावेत, यासाठी त्यांना खऱ्या अर्थाने सर्वाधिकार मिळावेत, अशी नेते व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शिवाय राहुल गांधी यांनीच लोकसभेत पक्षाचे नेतृत्व करावे, अशीही नेत्यांची इच्छा आहे.राहुल यांच्यासाठी धरणे, मोर्चेमात्र राहुल गांधी या सर्व बाबींविषयी बोलण्यात तयार नाहीत. ते स्वत: बोलायला तयार नसताना काँग्रेसचे प्रतिनिधी व प्रवक्ते यांनीही वृत्तवाहिन्यांवर जाऊ न काही बोलू नये, असा पक्षाचा निर्णय असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घ्यावा, असा सर्व राज्यांतील काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा आग्रह आहे. कार्यकर्ते ठिकठिकाणी उपोषण करीत आहेत, धरणे धरत आहेत. राहुल यांनी पक्षाध्यक्षपदी राहावे, यासाठी चेन्नई व पुडुच्चेरीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चेही काढले.

टॅग्स :congressकाँग्रेसMediaमाध्यमे