शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

“PM मोदींचा राष्ट्रवाद बोगस, द्वेषाचे राजकारण थांबायला हवे”; सोनिया गांधींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 17:21 IST

भारत कायमस्वरूपी ध्रुवीकरणाच्या स्थितीत असावा का, अशी विचारणा सोनिया गांधी यांनी केली आहे.

नवी दिल्ली: अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. मात्र, आता कोल्हापूरमध्ये भाजपला चितपट करत काँग्रेस उमेदवार मोठ्या फरकाने जिंकून आल्याने पक्षात आनंदाचे वातावरण आहे. यातच आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांचा राष्ट्रवाद बोगस आहे पण उन्माद कायमचा आहे, अशी घणाघाती टीका सोनिया गांधी यांनी केली. 

सोनिया गांधी यांनी प्रश्न उपस्थित करत, भारत कायमस्वरूपी ध्रुवीकरणाच्या स्थितीत असावा का? भारतातील नागरिकांनी असे वातावरण त्यांच्या हिताचे आहे, असा विश्वास स्पष्टपणे हवा आहे. पोशाख, आहार, श्रद्धा-भावना, सण वा भाषा असो, भारतीयांना भारतीयांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि मतभेद निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रत्येक प्रोत्साहन दिले जात आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी सोनिया गांधी यांनी लेख लिहिला आहे. यामध्ये केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 

भारतातील विविधतेचा स्वीकार करण्याबाबत PM ची बरीच चर्चा

भारतातील विविधतेचा स्वीकार करण्याबाबत पंतप्रधानांकडून बरीच चर्चा होत आहे. पण त्याच्या कार्यकाळात शतकानुशतके आपल्या समाजाला परिभाषित आणि समृद्ध करणारी विविधता विभाजित करण्यासाठी वापरली जात आहे, हे कटू वास्तव आहे, असे सांगत आपल्याला आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवावा लागेल, जेणेकरून पैसा उभा होईल आणि मग हा पैसा पुन्हा वितरित केला जाऊ शकतो, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. सामाजिक उदारमतवादाची घसरलेली पातळी आणि धर्मांधतेचे ढासळणारे वातावरण, द्वेषाचा प्रसार आणि विभाजन यांमुळे आर्थिक विकासाचा पायाच डळमळीत होतो, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. 

दरम्यान, आज आपल्या देशात द्वेष, धर्मांधता, असहिष्णुता आणि असत्याचे साम्राज्य पसरले आहे. जर आपण हे थांबवले नाही तर तो आपल्या समाजाला अशा प्रकारे नष्ट करेल की, ती पुन्हा पूर्ववत करणे कठीण होईल. आम्ही हे चालू ठेवू शकत नाही आणि देऊही नये. आम्ही व्यक्ती म्हणून उभे राहू शकत नाही आणि बोगस राष्ट्रवादावर शांतता आणि बहुलवादाचा त्याग पाहू शकत नाही, असे सांगत द्वेषाची त्सुनामी थांबवण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी आपल्या लेखात केले आहे. सोनिया गांधी यांनी विस्तृत आणि सखोल लिहिलेल्या लेखात देशातील अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा