शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

“PM मोदींचा राष्ट्रवाद बोगस, द्वेषाचे राजकारण थांबायला हवे”; सोनिया गांधींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 17:21 IST

भारत कायमस्वरूपी ध्रुवीकरणाच्या स्थितीत असावा का, अशी विचारणा सोनिया गांधी यांनी केली आहे.

नवी दिल्ली: अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. मात्र, आता कोल्हापूरमध्ये भाजपला चितपट करत काँग्रेस उमेदवार मोठ्या फरकाने जिंकून आल्याने पक्षात आनंदाचे वातावरण आहे. यातच आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांचा राष्ट्रवाद बोगस आहे पण उन्माद कायमचा आहे, अशी घणाघाती टीका सोनिया गांधी यांनी केली. 

सोनिया गांधी यांनी प्रश्न उपस्थित करत, भारत कायमस्वरूपी ध्रुवीकरणाच्या स्थितीत असावा का? भारतातील नागरिकांनी असे वातावरण त्यांच्या हिताचे आहे, असा विश्वास स्पष्टपणे हवा आहे. पोशाख, आहार, श्रद्धा-भावना, सण वा भाषा असो, भारतीयांना भारतीयांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि मतभेद निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रत्येक प्रोत्साहन दिले जात आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी सोनिया गांधी यांनी लेख लिहिला आहे. यामध्ये केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 

भारतातील विविधतेचा स्वीकार करण्याबाबत PM ची बरीच चर्चा

भारतातील विविधतेचा स्वीकार करण्याबाबत पंतप्रधानांकडून बरीच चर्चा होत आहे. पण त्याच्या कार्यकाळात शतकानुशतके आपल्या समाजाला परिभाषित आणि समृद्ध करणारी विविधता विभाजित करण्यासाठी वापरली जात आहे, हे कटू वास्तव आहे, असे सांगत आपल्याला आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवावा लागेल, जेणेकरून पैसा उभा होईल आणि मग हा पैसा पुन्हा वितरित केला जाऊ शकतो, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. सामाजिक उदारमतवादाची घसरलेली पातळी आणि धर्मांधतेचे ढासळणारे वातावरण, द्वेषाचा प्रसार आणि विभाजन यांमुळे आर्थिक विकासाचा पायाच डळमळीत होतो, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. 

दरम्यान, आज आपल्या देशात द्वेष, धर्मांधता, असहिष्णुता आणि असत्याचे साम्राज्य पसरले आहे. जर आपण हे थांबवले नाही तर तो आपल्या समाजाला अशा प्रकारे नष्ट करेल की, ती पुन्हा पूर्ववत करणे कठीण होईल. आम्ही हे चालू ठेवू शकत नाही आणि देऊही नये. आम्ही व्यक्ती म्हणून उभे राहू शकत नाही आणि बोगस राष्ट्रवादावर शांतता आणि बहुलवादाचा त्याग पाहू शकत नाही, असे सांगत द्वेषाची त्सुनामी थांबवण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी आपल्या लेखात केले आहे. सोनिया गांधी यांनी विस्तृत आणि सखोल लिहिलेल्या लेखात देशातील अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा