शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

“PM मोदींचा राष्ट्रवाद बोगस, द्वेषाचे राजकारण थांबायला हवे”; सोनिया गांधींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 17:21 IST

भारत कायमस्वरूपी ध्रुवीकरणाच्या स्थितीत असावा का, अशी विचारणा सोनिया गांधी यांनी केली आहे.

नवी दिल्ली: अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. मात्र, आता कोल्हापूरमध्ये भाजपला चितपट करत काँग्रेस उमेदवार मोठ्या फरकाने जिंकून आल्याने पक्षात आनंदाचे वातावरण आहे. यातच आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांचा राष्ट्रवाद बोगस आहे पण उन्माद कायमचा आहे, अशी घणाघाती टीका सोनिया गांधी यांनी केली. 

सोनिया गांधी यांनी प्रश्न उपस्थित करत, भारत कायमस्वरूपी ध्रुवीकरणाच्या स्थितीत असावा का? भारतातील नागरिकांनी असे वातावरण त्यांच्या हिताचे आहे, असा विश्वास स्पष्टपणे हवा आहे. पोशाख, आहार, श्रद्धा-भावना, सण वा भाषा असो, भारतीयांना भारतीयांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि मतभेद निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रत्येक प्रोत्साहन दिले जात आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी सोनिया गांधी यांनी लेख लिहिला आहे. यामध्ये केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 

भारतातील विविधतेचा स्वीकार करण्याबाबत PM ची बरीच चर्चा

भारतातील विविधतेचा स्वीकार करण्याबाबत पंतप्रधानांकडून बरीच चर्चा होत आहे. पण त्याच्या कार्यकाळात शतकानुशतके आपल्या समाजाला परिभाषित आणि समृद्ध करणारी विविधता विभाजित करण्यासाठी वापरली जात आहे, हे कटू वास्तव आहे, असे सांगत आपल्याला आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवावा लागेल, जेणेकरून पैसा उभा होईल आणि मग हा पैसा पुन्हा वितरित केला जाऊ शकतो, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. सामाजिक उदारमतवादाची घसरलेली पातळी आणि धर्मांधतेचे ढासळणारे वातावरण, द्वेषाचा प्रसार आणि विभाजन यांमुळे आर्थिक विकासाचा पायाच डळमळीत होतो, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. 

दरम्यान, आज आपल्या देशात द्वेष, धर्मांधता, असहिष्णुता आणि असत्याचे साम्राज्य पसरले आहे. जर आपण हे थांबवले नाही तर तो आपल्या समाजाला अशा प्रकारे नष्ट करेल की, ती पुन्हा पूर्ववत करणे कठीण होईल. आम्ही हे चालू ठेवू शकत नाही आणि देऊही नये. आम्ही व्यक्ती म्हणून उभे राहू शकत नाही आणि बोगस राष्ट्रवादावर शांतता आणि बहुलवादाचा त्याग पाहू शकत नाही, असे सांगत द्वेषाची त्सुनामी थांबवण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी आपल्या लेखात केले आहे. सोनिया गांधी यांनी विस्तृत आणि सखोल लिहिलेल्या लेखात देशातील अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा