शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘काँग्रेसने अहंकार सोडावा’, INDIAचं नेतृत्व कुणाकडे? विरोधी पक्षांच्या आघाडीत पडले दोन गट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:11 IST

INDIA Opposition Alliance: इंडिया आघाडीत नेतृत्वावरून सध्या घमासान सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. मात्र काँग्रेसकडून याला आक्षेप घेण्यात येत आहे. 

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या इंडिया आघाडीने केंद्रातील मोदी सरकारसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. तसेच या आघाडीने देशातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल तामिळनाडू आदी राज्यांत केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपाला लोकसभेत बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आलं होतं. इंडिया आघाडीला मिळालेल्या या यशाचं सर्वाधिक श्रेय हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिलं गेलं होतं.  दरम्यान, आता याच इंडिया आघाडीत नेतृत्वावरून सध्या घमासान सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. मात्र काँग्रेसकडून याला आक्षेप घेण्यात येत आहे. 

लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाने ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांच्यामध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबाबतची चर्चा होण्याची शक्यता आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या सर्व घडामोडींबाबत सांगितले की, काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडी अपयशी ठरली आहे, हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे. जर ममता बॅनर्जी ह्या नेत्या बनल्या तर ती खूप चांगली बाब ठरेल. आघाडीतील सर्वात मोठ्या नेत्या ह्या ममता बॅनर्जी आहेत. राजकीय लढाई कशी लढली जाते, हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. काँग्रेसने आपला इगो सोडला पाहिजे. काँग्रेसने आपल्या अहंकारापायीच ममता बॅनर्जी यांना हटवलं होतं.

दरम्यान ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले की, इंडिया आघाडी या मुद्द्यावर चर्चा करत आहे. काँग्रेससोबत आमचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांचे लोरसभेत सर्वाधिक खासदार आहेत. मात्र आम्ही अशा व्यक्तीबाबत चर्चा करत आहोत जी व्यक्ती इंडिया आघाडीच्या नेतृत्वाला वेळ देऊ शकेल.

तर लालू प्रसाद यादव यांनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची इंडिया आघाडीच्या नेतेपदी निवड केली पाहिजे, असे सांगितले. काँग्रेसकडून होणाऱ्या विरोधाला काही अर्थ नाही. ममता बॅनर्जी यांनाच नेता म्हणून नियुक्त केलं पाहिजे, असं सांगितलं. तसेच पुढच्या वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपला पक्ष विजयी होईल असा दावाही केला. 

ममता बॅनर्जी यांनी हरयाणा आणि महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या झालेल्या सुमार कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच संधी मिळाल्यास आपण इंडिया आघाडीचं नेतृत्व स्वीकारण्यास तयार असल्याचाही दावा केला होता. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीRahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस