शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

“पिक्चर अभी बाकी है... लोकसभा निवडणुकीचा निकाल अद्याप निश्चित नाही”: शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 11:31 IST

Congress Shashi Tharoor: राम मंदिरासह अबुधाबी येथील मंदिराचा मुद्दा बनवून जनतेकडून मते मागितली जातील, असा दावा करत शशी थरूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

Congress Shashi Tharoor: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासह अनेकांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी हा अंतरिम नाही अंतिम अर्थसंकल्प असल्याचे सांगत लोकसभा निवडणुकीचे निकाल अद्याप आलेले नाही, असे सूचक विधान केले आहे.

केंद्र सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प निराशाजनक आहे. अर्थमंत्र्यांच्या भाषणातून बेरोजगारीचा मुद्दा पूर्णपणे गायब होता. सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारण्याच्या बाबतीत सरकारला एफ म्हणजेच फेल ग्रेड दिली जाईल. महागाई, विशेषत: खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली वाढ इतकी धक्कादायक आहे की, देशातील २० टक्के जनता ते खरेदी करण्यासाठी सक्षम नाही, असा दावा शशी थरूर यांनी केला. 

सामान्य भारतीयांच्या जीवनातील हेच वास्तव आहे. म्हणूनच राम मंदिराचा अभिमान बाळगून लोकांनी मतदान करावे किंवा बालाकोट, पुलवामाप्रमाणे पाकिस्तानवर केलेल्या कथित हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले हा गर्व बाळगून मतदान करावे, असे केंद्र सरकारला वाटत आहे. २०१९ मध्ये भाजपाला अशाच पद्धतीने यश मिळाले होते, अशी टीका शशी थरूर यांनी केली.

दरम्यान, यावेळी राम मंदिराचा मुद्दा घेतला जाईल. त्यात अबुधाबी मंदिराची भर पडणार यात शंका नाही. साहजिकच अशी कामे करण्यासाठी सरकार निवडले जात नाही. सरकार हे सर्वसामान्यांचे जीवन सुधारण्यासाठी निवडून दिलेली असतात. हे या सरकारने केले का? मी म्हणेन की त्या विशिष्ट निकषावर केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, या शब्दांत शशी थरूर यांनी निशाणा साधला. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाcongressकाँग्रेसBudgetअर्थसंकल्प 2024