शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

“पिक्चर अभी बाकी है... लोकसभा निवडणुकीचा निकाल अद्याप निश्चित नाही”: शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 11:31 IST

Congress Shashi Tharoor: राम मंदिरासह अबुधाबी येथील मंदिराचा मुद्दा बनवून जनतेकडून मते मागितली जातील, असा दावा करत शशी थरूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

Congress Shashi Tharoor: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासह अनेकांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी हा अंतरिम नाही अंतिम अर्थसंकल्प असल्याचे सांगत लोकसभा निवडणुकीचे निकाल अद्याप आलेले नाही, असे सूचक विधान केले आहे.

केंद्र सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प निराशाजनक आहे. अर्थमंत्र्यांच्या भाषणातून बेरोजगारीचा मुद्दा पूर्णपणे गायब होता. सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारण्याच्या बाबतीत सरकारला एफ म्हणजेच फेल ग्रेड दिली जाईल. महागाई, विशेषत: खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली वाढ इतकी धक्कादायक आहे की, देशातील २० टक्के जनता ते खरेदी करण्यासाठी सक्षम नाही, असा दावा शशी थरूर यांनी केला. 

सामान्य भारतीयांच्या जीवनातील हेच वास्तव आहे. म्हणूनच राम मंदिराचा अभिमान बाळगून लोकांनी मतदान करावे किंवा बालाकोट, पुलवामाप्रमाणे पाकिस्तानवर केलेल्या कथित हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले हा गर्व बाळगून मतदान करावे, असे केंद्र सरकारला वाटत आहे. २०१९ मध्ये भाजपाला अशाच पद्धतीने यश मिळाले होते, अशी टीका शशी थरूर यांनी केली.

दरम्यान, यावेळी राम मंदिराचा मुद्दा घेतला जाईल. त्यात अबुधाबी मंदिराची भर पडणार यात शंका नाही. साहजिकच अशी कामे करण्यासाठी सरकार निवडले जात नाही. सरकार हे सर्वसामान्यांचे जीवन सुधारण्यासाठी निवडून दिलेली असतात. हे या सरकारने केले का? मी म्हणेन की त्या विशिष्ट निकषावर केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, या शब्दांत शशी थरूर यांनी निशाणा साधला. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाcongressकाँग्रेसBudgetअर्थसंकल्प 2024