शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

"भारतात विलीन होण्यासाठी ही किंमत घेतलीत"; इतिहास वाचा म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेसचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:22 IST

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Congress on Jyotiraditya Scindia: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात इतिहासावरुन शा‍ब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांनी आधी इतिहास वाचावा असं म्हटलं होतं. त्यावर आता काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. मध्यप्रदेशातील एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वी दलित, मागासलेले आणि आदिवासींना कोणतेही अधिकार नव्हते. त्यावेळी फक्त महाराज आणि राजे यांना अधिकार होते, असं विधान केलं होतं.

इंदौर येथे झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यानंतर मध्य प्रदेशात राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 'फक्त महाराजांना अधिकार होते या वक्तव्यावर भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी टीका केली होती. आता काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पोस्टवर प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय मंत्री राजघराण्यांचे ब्रिटिशांप्रती असलेले प्रेम विसरले असतील, पण आम्ही विसरू शकत नाही,' अशी टीका काँग्रेस नेते पवन खेरा यांनी म्हटलं आहे.

सोमवारी महू येथे एका सभेला संबोधित करताना गांधी यांनी, स्वातंत्र्यापूर्वी दलित, मागासलेले लोक आणि आदिवासी यांना कोणतेही अधिकार नव्हते, तेव्हा फक्त महाराज आणि राजे यांना अधिकार होते, असं म्हटलं. स्वातंत्र्यासोबतच बदल झाला. तुम्हाला जमीन आणि हक्क मिळाले. भाजपा-आरएसएसला स्वातंत्र्यपूर्व भारत हवा आहे, जिथे सामान्यांना कोणतेही अधिकार नव्हते आणि फक्त अदानी आणि अंबानी सारख्या लोकांना अधिकार होते. देश अब्जाधीश चालवत असताना गरिबांनी मूकपणे दु:ख भोगावे अशी त्यांची इच्छा आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना करताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी, संविधानाला आपली 'पॉकेट डायरी' मानणारे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वी भारतातील राजघराण्यांच्या भूमिकेवर दिलेले विधान त्यांची संकुचित विचारसरणी आणि समजूतदारपणा उघड करते असं म्हटलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे एक्स पोस्टवरुन राहुल गांधींवर निशाणा साधला. 

राहुल गांधींनी आधी इतिहास वाचावा - ज्योतिरादित्य शिंदे

"सत्तेच्या आणि पदाच्या हव्यासापोटी या राजघराण्यांनी भारतात समतेचा आणि सर्वसमावेशक विकासाचा पाया वर्षापूर्वी घातला होता, हे ते विसरले आहेत. मागासवर्गीयांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, ग्वाल्हेरच्या माधव महाराज प्रथम यांनी संपूर्ण ग्वाल्हेर-चंबळमध्ये शिक्षण आणि रोजगार केंद्रे उघडली होती. राहुल गांधींनी आधी इतिहास वाचावा मग वक्तव्ये करावीत," असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

यानंतर आता काँग्रेस नेते पवन खेरा यांनी शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. "इतिहास तुमच्याकडे बोट दाखवतो आणि रडतो, महाराज. जर राज्यघटनेची २६वी दुरुस्ती झाली नसती तर आजही ग्वाल्हेर राजघराण्याला (१९५० मध्ये २५,००,०००) भारत सरकारकडून कोट्यवधी रुपये करमुक्त दिले जात होते. भारतातील विलीनीकरणाची ही किंमत तुम्ही ७१ पर्यंत घेत राहिलात. राजघराण्यांनी केलेला विश्वासघात आणि इंग्रजांवरचे त्यांचे प्रेम तुम्ही विसरला असाल, आम्ही सगळे विसरू शकत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येत राजघराण्यातील पिस्तुल वापरण्यात आल्याचा इतिहास साक्षी आहे. अनेक राजघराण्यांच्या कुकर्मांची यादी काही राजांच्या चांगुलपणाने झाकली जाऊ शकत नाही," असं पवन खेरा यांनी म्हटलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश