शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

"भारतात विलीन होण्यासाठी ही किंमत घेतलीत"; इतिहास वाचा म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेसचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:22 IST

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Congress on Jyotiraditya Scindia: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात इतिहासावरुन शा‍ब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांनी आधी इतिहास वाचावा असं म्हटलं होतं. त्यावर आता काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. मध्यप्रदेशातील एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वी दलित, मागासलेले आणि आदिवासींना कोणतेही अधिकार नव्हते. त्यावेळी फक्त महाराज आणि राजे यांना अधिकार होते, असं विधान केलं होतं.

इंदौर येथे झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यानंतर मध्य प्रदेशात राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 'फक्त महाराजांना अधिकार होते या वक्तव्यावर भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी टीका केली होती. आता काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पोस्टवर प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय मंत्री राजघराण्यांचे ब्रिटिशांप्रती असलेले प्रेम विसरले असतील, पण आम्ही विसरू शकत नाही,' अशी टीका काँग्रेस नेते पवन खेरा यांनी म्हटलं आहे.

सोमवारी महू येथे एका सभेला संबोधित करताना गांधी यांनी, स्वातंत्र्यापूर्वी दलित, मागासलेले लोक आणि आदिवासी यांना कोणतेही अधिकार नव्हते, तेव्हा फक्त महाराज आणि राजे यांना अधिकार होते, असं म्हटलं. स्वातंत्र्यासोबतच बदल झाला. तुम्हाला जमीन आणि हक्क मिळाले. भाजपा-आरएसएसला स्वातंत्र्यपूर्व भारत हवा आहे, जिथे सामान्यांना कोणतेही अधिकार नव्हते आणि फक्त अदानी आणि अंबानी सारख्या लोकांना अधिकार होते. देश अब्जाधीश चालवत असताना गरिबांनी मूकपणे दु:ख भोगावे अशी त्यांची इच्छा आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना करताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी, संविधानाला आपली 'पॉकेट डायरी' मानणारे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वी भारतातील राजघराण्यांच्या भूमिकेवर दिलेले विधान त्यांची संकुचित विचारसरणी आणि समजूतदारपणा उघड करते असं म्हटलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे एक्स पोस्टवरुन राहुल गांधींवर निशाणा साधला. 

राहुल गांधींनी आधी इतिहास वाचावा - ज्योतिरादित्य शिंदे

"सत्तेच्या आणि पदाच्या हव्यासापोटी या राजघराण्यांनी भारतात समतेचा आणि सर्वसमावेशक विकासाचा पाया वर्षापूर्वी घातला होता, हे ते विसरले आहेत. मागासवर्गीयांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, ग्वाल्हेरच्या माधव महाराज प्रथम यांनी संपूर्ण ग्वाल्हेर-चंबळमध्ये शिक्षण आणि रोजगार केंद्रे उघडली होती. राहुल गांधींनी आधी इतिहास वाचावा मग वक्तव्ये करावीत," असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

यानंतर आता काँग्रेस नेते पवन खेरा यांनी शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. "इतिहास तुमच्याकडे बोट दाखवतो आणि रडतो, महाराज. जर राज्यघटनेची २६वी दुरुस्ती झाली नसती तर आजही ग्वाल्हेर राजघराण्याला (१९५० मध्ये २५,००,०००) भारत सरकारकडून कोट्यवधी रुपये करमुक्त दिले जात होते. भारतातील विलीनीकरणाची ही किंमत तुम्ही ७१ पर्यंत घेत राहिलात. राजघराण्यांनी केलेला विश्वासघात आणि इंग्रजांवरचे त्यांचे प्रेम तुम्ही विसरला असाल, आम्ही सगळे विसरू शकत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येत राजघराण्यातील पिस्तुल वापरण्यात आल्याचा इतिहास साक्षी आहे. अनेक राजघराण्यांच्या कुकर्मांची यादी काही राजांच्या चांगुलपणाने झाकली जाऊ शकत नाही," असं पवन खेरा यांनी म्हटलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश