शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

१२८ देशांच्या राजकीय पक्षांशी काँग्रेसचे संबंध -आनंद शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 05:49 IST

काँग्रेसचा पलटवार; भाजपचे असे संबंध नाहीत का?

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेस आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टीदरम्यानच्या समझोत्यावरून केल्या जात असलेल्या हल्ल्यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार पलटवार केला. काँग्रेसचे १२८ देशांच्या राजकीय पक्षांसोबत संबंध आहे. भाजपचे दुसऱ्या देशांतील राजकीय पक्षांशी संबंध नाहीत का? हे भाजपने आधी स्पष्ट करावे. भाजप ढोंग करीत असून, भाजपचा हा दुटप्पीपणा आहे, असे म्हणत काँग्रेसच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रभारी आनंद शर्मा यांनी भाजपवर निशाणा साधला.स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेस जगातील राजकीय पक्षांसोबत पक्षस्तरीय संबंध प्रस्थापित करीत आहे. काँग्रेसचे आज जगातील १२८ देशांतील राजकीय पक्षांसोबत संबंध असून, सर्व मुद्यांवर पक्षपातळीवर विचारविनिमय केला जातो, असे सांगत आनंद शर्मा यांनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली.२०१५ मध्ये भाजपच्या एका सहयोगी संघटनेने चीनमध्ये समझोता करार स्वाक्षरित केला नव्हता का? राम माधव यांनी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून चीनचे किती दौरे केले? आॅगस्ट २०१९ मध्ये भाजपचे ११ सदस्यांचे एक शिष्टमंडळ चीन दौºयावर असताना भाजपने चीनच्या कम्युनिस्ट पार्टीसोबत पक्षस्तरीय संबंध प्रस्थापित करण्याचे साकडे घातले नव्हते का? अशा प्रश्नांचा भडिमार करीत आनंद शर्मा यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.सप्टेंबर २०१९ मध्ये भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या नेतृत्वाखाली चीन दौºयावर गेलेल्या शिष्टमंडळात विजय चौथाईवाले यांचा समावेश होता.या शिष्टमंडळाचा उद्देश पक्षस्तरीय संबंध स्थापन करण्याचा नव्हता का? चौथाईवाले यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस साँग ताओ यांना सुपूर्द केलेल्या अमित शहा यांच्या पत्रात काय लिहिले होते? हे भाजपने जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी केले.काँग्रेसने आज जगातील १२८ देशांतील राजकीय पक्षांशी संबंध असून, पक्षपातळीवर सर्व मुद्यांवर चर्चाही केली जाते. आफ्रिकेतील ४३ राजकीय पक्षांसोबत संबंधासोबत सहमती करारही आहे, असेही आनंद शर्मा यांनी स्पष्ट केले.राजकीय पक्षपातळीवर संबंधाची सुरुवात नेहरूंच्या काळात झाली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी ही परंपरा चालू ठेवली. नेपाळी काँग्रेस, तत्कालीन सोव्हिएत संघातील कम्युनिस्ट पार्टीसोबत समझोता करार आहे. आजही ब्रिटनच्या मजूर पक्षासोबत सहमतीच्या आधारवर काँग्रेसचे संबंध आहेत. जर्मनी, रशियासह जगातील १२८ देशांत काँग्रेसचे सहमतीच्या आधारावर राजकीय पक्षांशी संबंध असून, ते आजही कायम आहेत.यात नावीन्य काही नाहीराजकीय पक्षांचे दुसºया देशांशी संबंध असण्यात काहीही नावीन्य नाही. काँग्रेसच्या अधिवेशनात विदेशी मित्र देशांचे प्रतिनिधीही सहभागी होत असतात. काँग्रेसने कोणत्या नेत्याने केव्हा आणि कोणत्या देशांसोबत पक्षस्तरीय समझोता करार केले, हे नीटसे आठवत नाही. तथापि, असे करार फक्त पक्षांसाठी होतात. सरकारशी त्याचा काहीही संबंध नसतो, तसेच सरकारसाठी बंधनकारक नसतात, असे काँग्रेसचे जुने नेते नटवर सिंह म्हणतात.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा