शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वंचित, स्वराज्य, स्वाभिमानीला जागा देण्यास काँग्रेस तयार; राहुल गांधी, खरगे निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 07:55 IST

दीड तास चाललेल्या बैठकीत महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीसोबत जागावाटपाचे सूत्र कसे असेल, यावर चर्चा झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाला महाविकास आघाडीत स्थान देण्याविषयी  राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. या विषयावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निर्णय घ्यायचा आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या ४९, लोधी इस्टेट या निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीचे सदस्य अशोक गहलोत, भूपेश बघेल, मुकुल वासनिक, सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे रमेश चेन्नीथला यांच्याशी राज्यातील काँग्रेसच्या सहा बड्या नेत्यांची महाविकास आघाडी तसेच जागावाटपाविषयी धोरणात्मक चर्चा झाली. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण तसेच मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड हे नेते आले होते.

दीड तास चाललेल्या या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर  महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाचे सूत्र कसे असेल, यावर चर्चा झाली. या बैठकीत कुठलाही फॉर्म्युला ठरला नसल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. मुंबईत महाविकास आघाडीसोबत राज्यातील काँग्रेसची चर्चा होईल, असेही ते म्हणाले.

वंचितचा प्रश्न ठाकरेंमुळे सुटेल  

ठाकरे गटाने लोकसभेच्या ४८ पैकी २३ जागांवर दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांची वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू असल्याने शिवसेनेने आपल्या कोट्यातून वंचितसाठी जागा सोडल्यास जागावाटपाचा प्रश्न सुटू शकतो, असे या बैठकीत सहभागी झालेल्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. वंचितशिवाय स्वराज्य आणि स्वाभिमानी पक्षाला मविआमध्ये सामावून घेण्याविषयीही बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसची राष्ट्रीय आघाडी समिती आजच्या बैठकीचा अहवाल खरगे आणि राहुल गांधी यांच्यापुढे मांडणार असून, त्यानंतरच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसश्रेष्ठींची जागावाटपाविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी