शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

Rahul Gandhi : "चीनने आपली जमीन बळकावली, पंतप्रधान खरं बोलत नाहीत"; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 11:23 IST

Congress Rahul Gandhi And PM Narendra Modi : राहुल गांधी यांनी "लडाखच्या लोकांच्या अनेक तक्रारी आहेत, त्यांना जो दर्जा देण्यात आला आहे त्यावर ते खूश नाहीत. त्यांना प्रतिनिधित्व हवे आहे आणि बेरोजगारीची समस्या आहे" असं म्हटलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लडाखमध्ये मोठं विधान केलं आहे. "लडाखच्या लोकांनी मला सांगितलं आहे की, चिनी सैन्य येथे घुसलं आहे. त्यांना जी पूर्वी त्यांची ग्रेजिंग लँड होती तिथे जाता येत नाही  लडाखमध्ये प्रत्येकजण हेच म्हणत आहे. एक इंचही जमीन गेली नाही असे पंतप्रधान म्हणाले आहेत, पण ते खरं नाही. तुम्ही इथे कोणालाही विचारा, तो तुम्हाला सांगेल" असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. 

राहुल गांधी यांनी "लडाखच्या लोकांच्या अनेक तक्रारी आहेत, त्यांना जो दर्जा देण्यात आला आहे त्यावर ते खूश नाहीत. त्यांना प्रतिनिधित्व हवे आहे आणि बेरोजगारीची समस्या आहे. नोकरशाहीने नव्हे तर जनतेच्या आवाजाने राज्य चालवले पाहिजे, असे लोक म्हणत आहेत" असं म्हटलं आहे. 

राहुल गांधी वडील राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त लडाखला पोहोचले. पँगॉन्ग त्सो लेक येथे त्यांनी वडिलांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेच्या वेळी लडाखला जायचं होतं, मात्र काही कारणास्तव तेथे जाऊ शकलो नाही, असं सांगितलं. मग लडाखचा दौरा सविस्तरपणे करू असा विचार केला. ते लेहला गेले होते आणि पँगॉन्गनंतर आता नुब्राला जात आहे. यानंतर कारगिललाही जाणार आहेत. 

शनिवारी एक दिवस आधी राहुल लडाखहून पँगॉन्गला रवाना झाले होते. यादरम्यान ते म्हणाले होते, 'माझे वडील पँगॉन्गबद्दल म्हणायचे की, ते जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.' शनिवारी सकाळी राहुल रायडर लूकमध्ये पँगॉन्ग त्सो लेककडे रवाना झाला. राहुलच्या या साहसाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राहुल गांधी यांनीही त्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

युवक काँग्रेसच्या नेत्यांशीही केली चर्चा 

राहुल यांनी लडाख गाठून युवा काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. काही राजकीय लोक देशात द्वेषाचे वातावरण निर्माण करत आहेत. तुम्ही भारतात गेलात, लोकांमध्ये जा, तुम्हाला दिसेल की लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे असं राहुल गांधी म्हणाले होते. 20 ऑगस्ट 1944 रोजी राजीव गांधी यांचा जन्म झाला होता. काँग्रेस हा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीladakhलडाख