शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

"मोदी सरकारच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी, मित्रांना विकतात फ्रीमध्य़े संपत्ती"; 'अशी' वाढली महागाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 17:16 IST

Congress Rahul Gandhi Slams Modi Government : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.  

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना देशातील महागाई ही ९ वेळा दुहेरी आकड्यांमध्ये राहिली. २२ महिने किरकोळ महागाईचा दर ९ टक्क्यांपेक्षा अधिक होता. आमचे सरकार महागाईला ७ टक्क्यांच्या खाली आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे लोकसभेत सोमवारी सांगितले. मात्र त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी देशातील वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.  

"मोदी सरकारच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी, मित्रांना विकतात फ्रीमध्य़े संपत्ती" असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अमृतमोत्सवाच्या जल्लोषात मग्न असणाऱ्या भाजपा सरकारने देशात महागाई नाही, असे सभागृहात सांगितलेल्यांना महागाई कशी दिसेल? कारण त्यांनी डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधली असून देशाची संपत्ती 'फ्री फंडा'मध्ये 'मित्रांना' विकत आहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच 2019 पासून देशात किती टक्के महागाई वाढली याची आकडेवारीच दिली आहे. 

मुलांनाही सोडत नाही

ग्राहकोपयोगी वस्तू गगनाला भिडत आहेत. तांदूळ, दही, पनीर यांसारख्या वस्तू, पेन्सिल आणि शार्पनरसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर जीएसटी वाढवण्यात आला आहे. सरकार मुलांनाही सोडत नाही.- मनीष तिवारी, काँग्रेस नेते

सोमवारी लोकसभेत महागाईवर चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार झाले. सरकारच्यावतीने उत्तर देताना सीतारमण म्हणाल्या की, सध्या जगभरात काय चालले आहे आणि भारताचे जगात काय स्थान हे, पहायला हवे. जगाने कोरोना आजाराचा सामना यापूर्वी कधीही केला नव्हता. महामारीतून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक जण आपल्या स्तरावर काम करत आहे. त्यामुळेच अतिशय कठीण परिस्थिती असताना भारताची अर्थव्यवस्था अतिशय भक्कम राहिली आहे.

सरकारने महागाई कमी करण्यासाठी आयात शुल्क पूर्णपणे हटवले आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. महामारी, दुसरी लाट, ओमायक्रॉन, रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाही भारताने महागाई दर ७ टक्क्यांवर ठेवण्यात यश मिळवल्याचे सीतारमण यांनी सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीInflationमहागाई