शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

"मोदी सरकारच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी, मित्रांना विकतात फ्रीमध्य़े संपत्ती"; 'अशी' वाढली महागाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 17:16 IST

Congress Rahul Gandhi Slams Modi Government : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.  

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना देशातील महागाई ही ९ वेळा दुहेरी आकड्यांमध्ये राहिली. २२ महिने किरकोळ महागाईचा दर ९ टक्क्यांपेक्षा अधिक होता. आमचे सरकार महागाईला ७ टक्क्यांच्या खाली आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे लोकसभेत सोमवारी सांगितले. मात्र त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी देशातील वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.  

"मोदी सरकारच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी, मित्रांना विकतात फ्रीमध्य़े संपत्ती" असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अमृतमोत्सवाच्या जल्लोषात मग्न असणाऱ्या भाजपा सरकारने देशात महागाई नाही, असे सभागृहात सांगितलेल्यांना महागाई कशी दिसेल? कारण त्यांनी डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधली असून देशाची संपत्ती 'फ्री फंडा'मध्ये 'मित्रांना' विकत आहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच 2019 पासून देशात किती टक्के महागाई वाढली याची आकडेवारीच दिली आहे. 

मुलांनाही सोडत नाही

ग्राहकोपयोगी वस्तू गगनाला भिडत आहेत. तांदूळ, दही, पनीर यांसारख्या वस्तू, पेन्सिल आणि शार्पनरसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर जीएसटी वाढवण्यात आला आहे. सरकार मुलांनाही सोडत नाही.- मनीष तिवारी, काँग्रेस नेते

सोमवारी लोकसभेत महागाईवर चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार झाले. सरकारच्यावतीने उत्तर देताना सीतारमण म्हणाल्या की, सध्या जगभरात काय चालले आहे आणि भारताचे जगात काय स्थान हे, पहायला हवे. जगाने कोरोना आजाराचा सामना यापूर्वी कधीही केला नव्हता. महामारीतून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक जण आपल्या स्तरावर काम करत आहे. त्यामुळेच अतिशय कठीण परिस्थिती असताना भारताची अर्थव्यवस्था अतिशय भक्कम राहिली आहे.

सरकारने महागाई कमी करण्यासाठी आयात शुल्क पूर्णपणे हटवले आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. महामारी, दुसरी लाट, ओमायक्रॉन, रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाही भारताने महागाई दर ७ टक्क्यांवर ठेवण्यात यश मिळवल्याचे सीतारमण यांनी सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीInflationमहागाई