शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

Rahul Gandhi : "लोकांची दिशाभूल केल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही; भारताची स्थिती पूर्णपणे श्रीलंकेसारखी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 19:18 IST

Congress Rahul Gandhi : इंधनाचे वाढते दर आणि बेरोजगारी यासह आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी मोदी सरकारवर केला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी महागाईसह इतर मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. भारतातील पेट्रोलचे दर, बेरोजगारी आणि जातीय हिंसाचाराचा आलेख श्रीलंकेसारखाच असून सरकारने लोकांचे लक्ष त्यापासून हटवू नये असं म्हटलं आहे. 

इंधनाचे वाढते दर आणि बेरोजगारी यासह आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी मोदी सरकारवर केला आहे. ट्विटरवर एक ग्राफिक इमेज शेअर करत त्यांनी लोकांची दिशाभूल केल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही. भारताची स्थिती पूर्णपणे श्रीलंकेसारखी दिसते असं म्हटलं आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 

ग्राफमध्ये भारत आणि श्रीलंकेतील पेट्रोलच्या किमती, बेरोजगारी आणि हिंसाचाराच्या घटनांशी संबंधित आलेखाची तुलना करताना राहुल गांधी यांनी हे सांगितले. इतकेच नाही तर महागाई, बेरोजगारी आणि हिंसाचार या मुद्द्यांवरही भारत श्रीलंकेच्या मार्गावर पुढे जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी भाजपा सरकारवर हल्लाबोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी एका सभेत त्यांनी मोदी सरकारवर देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू केला, त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसInflationमहागाईUnemploymentबेरोजगारी