शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

“BJP-RSSला फक्त सत्ता हवी, त्यासाठी देशही जाळतील”; राहुल गांधींची PM मोदींवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 16:17 IST

Congress Rahul Gandhi On Manipur Violence: मोदी मणिपूरबद्दल का बोलत नाहीत? असा सवाल करत, ते फक्त निवडक लोकांचे पंतप्रधान आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली.

Congress Rahul Gandhi On Manipur Violence: मणिपूरमधील हिंसाचारावरून सत्ताधारी मोदी सरकार आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. मणिपूरमधील घटनेवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर घणाघाती टीका केली आहे. एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी मणिपूर घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच धारेवर धरले. 

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ ट्वीट करण्यात आलेला आहे. त्यामध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. देशाचा एक भाग जळतोय तरीही देशाचे पंतप्रधान गप्प कसे? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली आहे. मणिपूरमध्ये काय घडतेय, ते संपूर्ण देश बघतोय. परंतु पंतप्रधानांनी मणिपूरबद्दल एक शब्दही काढला नाही. देशाचा एक प्रदेश जळत असतांना देशाच्या पंतप्रधानांनी काहीतरी बोलले पाहिजे. विमानाने जाऊन कमीत कमी लोकांशी चर्चा करतील, असे वाटत होते. परंतु नरेंद्र मोदी गप्प आहेत, या शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला. 

BJP-RSSला फक्त सत्ता हवी, त्यासाठी देशही जाळतील

नरेंद्र मोदी हे आरएसएसचे पंतप्रधान आहेत, त्यांना मणिपूरशी काही देणेदेघणे नाही. त्यांना माहिती आहे की, त्यांच्या विचारधारेमुळेच मणिपूर जळत आहे. मणिपूरमध्ये महिलांवर जो अन्याय होतोय, तेथील जनतेच्या सुख, दुःखाची काळजी मोदींना नाही. मोदींना काहीही फरक पडत नाही, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फक्त आणि फक्त सत्ता हवी आहे आणि त्यासाठी ते देशही जाळायला मागेपुढे पाहणार नाहीत, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. तुमच्या मनात जर देशभक्ती आहे, तर जेव्हा देश दुखावतो, देशाचा कोणताही नागरिक दुखावतो तेव्हा तुम्हालाही दुःख होते. मात्र, भाजप-RSSच्या लोकांना काहीच वेदना होत नाही, कारण ते भारताचे विभाजन करण्याचे काम करत आहेत, असे टीकास्त्र राहुल गांधींनी सोडले.

दरम्यान, विरोधी आघाडीने INDIA हे नाव निवडले. आम्ही हे नाव निवडताच नरेंद्र मोदी याला शिव्या देऊ लागले. मोदीजींना इतका अहंकार आहे की, ते INDIA या पवित्र शब्दावर टीका करत आहेत, असे सांगत, काँग्रेसचे पंतप्रधान असते तर तिथेच बसले असते. मागे होऊन गेलेले कोणतेही पंतप्रधान असते तर अशी वेळ आली नसती. या परिस्थितीत पंतप्रधान कधी बोलतात, याची वाट पाहावी लागली नसती. मात्र, देशाचे पंतप्रधान मणिपूरबद्दल का बोलत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे कारण ते निवडक लोकांचे पंतप्रधान आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी