शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

जिग्नेश-कन्हैयाच्या माध्यमानं नव्या प्रयोगासाठी काँग्रेस तयार; असं आहे राजकारण, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 08:46 IST

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2007 मध्ये पक्षाचे सरचिटणीस म्हणून युवक काँग्रेस आणि एनएसयूआयमध्ये अंतर्गत निवडणुकांची सुरुवात केली होती. याचा उद्देश, अगदी तळागाळातील युवक कार्यकर्त्यांना पुढे येण्याची संधी देण्याचा होता. पण...

नवी दिल्ली - एकामागून एक निवडणुकीत पराभवाला सामोरे जाणारी काँग्रेस आता आणखी एक नवा प्रयोगासाठी सज्ज आहे. आंदोलनातून समोर येणाऱ्या तरुणांना पक्षात स्थान देऊन निवडणुकीत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची काँग्रेसची इच्छा आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवानी हे पक्षाच्या रणनीतीचा एक भाग आहेत. हे दोन्ही तरूण नेते मंगळवारी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी, हे देशभरातील तरुणांना काँग्रेसशी जोडण्याच्या पक्षाच्या योजनेचा एक भाग आहेत. सर्व राज्यांतील तरुणांना जोडण्यासाठी काँग्रेस एक मोहीम राबविण्याची तयारी करत आहे. राजकारणात प्रयोग करण्याची ही काँग्रेसची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही काँग्रेसचे अनेक प्रयोग केले आहेत. मात्र, या प्रयोगांचे परिणाम फारसे उत्साहवर्धक ठरले नाहीत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2007 मध्ये पक्षाचे सरचिटणीस म्हणून युवक काँग्रेस आणि एनएसयूआयमध्ये अंतर्गत निवडणुकांची सुरुवात केली होती. याचा उद्देश, अगदी तळागाळातील युवक कार्यकर्त्यांना पुढे येण्याची संधी देण्याचा होता. हा एक अतिशय चांगला प्रयोग होता. मात्र, राज्यांतील वरिष्ठ नेत्यांच्या घरांशी संबंध असलेले युवकच पैशाच्या बळावर निवडणुका जिंकून पदाधिकारी बनले.

कॉंग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरविण्यासाठी डेटाचा वापर केला होता. पक्षाने 300 जागांसाठी डेटाच्या विश्लेषणाच्या आधारे उमेदवार ठरविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. असे अनेक प्रयोग यापूर्वी काँग्रेसने केले आहेत. असे असताना, आता कन्हैया आणि जिग्नेश यांच्या माध्यमाने तरुणांना जोडण्यात काँग्रेसचा प्रयोग किती यशस्वी होणार, हे येणारा काळच ठरवेल.

टॅग्स :congressकाँग्रेसJignesh Mevaniजिग्नेश मेवानीkanhaiya kumarकन्हैय्या कुमार