शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

'श्रीमंताच्या मुलाला निबंध अन् ट्रक चालकांना १० वर्षाची शिक्षा'; पुणे प्रकरणात राहुल गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 09:02 IST

Pune Accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला रोखठोक सवाल विचारला आहे.

Pune porsche accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणावरुन आता देशपातळीवरुन भाष्य केलं जात आहे. पुण्याच्या कल्याणीनगर भागात मद्यप्राशन करून अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवून धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला विशेष हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले होते. मात्र कोर्टाने आरोपी मुलाची जामिनावर सुटका केली होती. या निर्णयामुळे अनेकांनी संताप व्यक्तदेखील केला. दुसरीकडे आता या अपघात प्रकरणावरुन राजकारण सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व्हिडीओमार्फत पुणे अपघात प्रकरणी आपला रोष व्यक्त केला आहे.

पुण्याच्या कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव पोर्श कारने एका बाईकला धडक दिली होती. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र या प्रकरणातील आरोपी मुलगा हा अल्पवयीन असल्याने त्याची कोर्टाने जामिनावर सुटका केली. आरोपीला जामीन मिळाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे सरकारने मात्र कोर्टाची भूमिका धक्कादायक असल्याचे म्हटलं आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याच प्रकरणावरुन सरकारला घेरलं आहे.

"दोघांचा बळी गेल्यानंतर तु्म्ही श्रीमंत घरातील मुलाकडून निबंध लिहून घेता म्हणत राहुल गांधींची पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल केला. जर बस, ट्रक, ओला, उबर किंवा रिक्षा चालकाकडून झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास सुनावला जातो. पण १६ ते १७ वर्षांचा श्रीमंत कुटुंबातील मुलगा जेव्हा दोघांचे प्राण घेतो तेव्हा त्याला निबंध लिहायला सांगितलं जातो. ट्रक आणि ओला चालकांना अशी निबंध लिहिण्याची शिक्षा का दिली जात नाही? न्याय हा सर्वांसाठी समान हवा. यासाठीच आम्ही संघर्ष करतोय. आम्ही न्यायासाठी लाढत आहोत. श्रीमंत आणि गरीब या दोघांसाठीही समान न्याय हवा," असे राहुल गांधींनी म्हटलं आहे. 

"नरेंद्र मोदींनी जेव्हा देशात दोन भारत बनवले जात आहेत, एक अब्जाधीशांसाठी, एक गरिबांसाठी असा प्रश्न विचारलो जातो तेव्हा त्यांचे उत्तर मी सर्वांना गरीब करू का? असे होते. सध्या प्रश्न हा नाही, प्रश्न न्यायाचा आहे. न्याय गरीब-श्रीमंत सर्वांना सारखाच असला पाहिजे. यासाठीच आम्ही लढत आहोत. अन्यायाविरुद्ध लढत आहे," असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Pune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPuneपुणेRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी