शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:05 IST

Ramdas Athawale And Rahul Gandhi : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राहुल गांधी घाबरले आहेत" असं म्हणत निशाणा साधला. विरोधी पक्षाच्या खासदारांना ताब्यात घेतल्यानंतर आठवले यांनी "काँग्रेस सरकारच्या काळातही असं घडत होतं. आम्ही आंदोलन करायचो" असं म्हटलं आहे. ANI शी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.

"मला वाटतं की, राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात. म्हणूनच ते प्रत्येक निवडणुकीत पराभूत होत आहेत. जर निवडणूक आयोग त्यांना बोलावत असेल तर त्यांनी जावं. जर काही घोटाळा झाला असेल तर त्यांना तिथे जाण्याचा अधिकार आहे. पण राहुल गांधी तिथे जात नाहीत. निवडणूक आयोग तुम्हाला वारंवार येण्यास सांगत आहे. पण निवडणूक आयोगाविरुद्ध रॅली काढण्यात काही अर्थ नाही. विरोधकांकडे दुसरा कोणताही विषय नाही. म्हणूनच ते वारंवार असे चुकीचे मुद्दे उपस्थित करत आहेत."

"मतचोरीची कोणतीही घटना नाही. मतांची चोरी करणाऱ्यांना हटवण्याचं काम केलं जात आहे. ज्यांची नावं दोन, तीन ठिकाणी आहेत, त्यांची नावे काढून टाकली पाहिजेत. या ठिकाणचे नागरिक नसलेल्यांना रोखण्यासाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. हे केवळ बिहारसाठी नाही, तर ते संपूर्ण भारतासाठी आहे. ते आपल्यासाठी देखील आहे. यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. लोकशाहीत ज्याला बहुमत मिळतं त्याला सत्तेत येण्याचा अधिकार आहे" असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. 

मतचोरीच्या मुद्द्यावरुन सध्या देशातील राजकारण तापलं आहे. राहुल गांधी यांनी मतदार यादीतील अनियमिततेबाबत गंभीर आरोप केले आहेत. यावरुन आज राहुल यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या मकर द्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकरल्यामुळे सर्व आंदोलक खासदारांना रोखण्यात आलं. याच दरम्यान अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग