शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

CoronaVirus: “हा तर मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी PM मोदींनी केलेला PR स्टंट”; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 19:52 IST

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोलकोरोना परिस्थितीवरून साधला निशाणाकोरोना मृत्यूंवरून सोडले टीकास्त्र

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा उद्रेक देशात झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण झालेली दिसत असली, तरी वाढते मृत्यूंचे प्रमाण चिंता वाढवणारे ठरत आहे. आता याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी PM मोदींनी केलेला PR स्टंट आहे, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. (congress rahul gandhi criticized pm modi over corona deaths)

काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. कोरोनाची परिस्थिती, लसीकरण, ऑक्सिजन टंचाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, सिलेंडर गॅसच्या वाढत्या किमती, व्यवस्थापन यांवरून जोरदार निशाणा साधला आहे. आता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंवरून राहुल गांधी यांनी टीका केली असून, एक ट्विट केले आहे. 

हा तर PM मोदींनी केलेला PR स्टंट

सकारात्मकता हा पंतप्रधानांचा पीआर स्टंट आहे. त्यांच्या कृतीमुळे निर्णयांमुळे झालेले करोनाचे मृत्यू झाकण्यासाठी हा करण्यात आला आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान अहंकारी असल्याचा अप्रत्यक्ष टोला अलीकडेच लगावला होता. ‘एक तो महामारी, उस पर प्रधान अहंकारी’ असे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. या ट्विटसोबत त्यांनी सीरमचे कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांच्या आरोपांचा दाखला दिला होता.

Google कडून ७ कोटींचे बक्षीस मिळवण्याची संधी; केवळ ‘हे’ काम करा अन् मालामाल व्हा

आरोग्यमंत्र्यांचे राहुल गांधींवर टीकास्त्र

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. हर्षवर्धन यांनी राहुल गांधींचा दिल्लीपेक्षा न्यूयॉर्कवर अधिक विश्वास आहे असे म्हटले आहे. तसेच मृतांच्या नावाने राजकारण करणे काँग्रेसच्या या गिधाडांकडून शिकावे, असे म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधींनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. मृतांच्या नावाने राजकारण करणे ही काँग्रेसची स्टाईल आहे. झाडांवरील गिधाडे सध्या दिसेनासी झाली असली तर त्यांच्यातील ऊर्जा जमिनीवरील गिधाडांमध्ये आल्यासारखे वाटत आहे. राहुल गांधींचा दिल्लीपेक्षा न्यूयॉर्कवर जास्त विश्वास आहे. मृतांच्या नावाने राजकारण करणे हे जमिनीवरील 'या' गिधाडांकडून शिकावे, असे ट्विट हर्षवर्धन यांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाPoliticsराजकारण