शहरं
Join us  
Trending Stories
1
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
2
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
3
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
4
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
5
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
6
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
7
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
8
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
9
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
10
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
11
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
12
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
13
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
14
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
15
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
16
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
17
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
19
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
20
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

“शिक्षण संस्थांवर RSS-BJPच्या लोकांचा कब्जा”; NEET-NET पेपरफुटीवरुन राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 17:18 IST

Rahul Gandhi On NEET-NET Exam: पंतप्रधानांना सरकार चालवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांचे सगळे लक्ष आता लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

Rahul Gandhi On NEET-NET Exam: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-गाजातील संघर्ष रोखले असे सांगितले जाते. परंतु, देशातील नीट आणि नेट परीक्षेतील पेपरफुटी पंतप्रधान मोदी थांबवू शकले नाहीत, अशी टीका काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. नीट परीक्षेतील मोठा घोळ समोर आल्यानंतर १८ जून रोजी घेण्यात आलेली नेट परीक्षाही रद्द करण्यात आली. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले असून, राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना नीट आणि नेट परीक्षेवरून हल्लाबोल केला.

सर्व शिक्षण संस्था RSS आणि भाजपाच्या लोकांनी ताब्यात घेतल्या आहेत. या शिक्षण संस्था आरएसएस आणि भाजपामुक्त होत नाहीत, तोपर्यंत हे असे प्रकार सुरूच राहणार. पंतप्रधान मोदी नीट आणि नेट परीक्षेतील घोळ थांबवू शकले नाहीत. या सर्व गैरप्रकाराला जबाबदार कोण आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांना पकडले गेले पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केली. या सर्व प्रकाराची चौकशी व्हायलाच हवी, हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत. ज्यांनी पेपर लीक केला, त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. आगामी लोकसभा निवडणुकीत यासंदर्भात सरकारला जाब विचारणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

पंतप्रधान निर्णय घेण्यास सक्षम नाहीत

या पेपरफुटीचे केंद्र मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश आहे. सरकारबाबत विश्वासार्हता राहिलेली नाही. शिक्षण व्यवस्थेवर एकाच संघटनेने ताबा घेतला आहे. यातील पदांवर त्यांचेच लोक नियुक्त करण्यात आले आहेत. पंतप्रधान कोणताही निर्णय घेण्यास सक्षम नाही. त्यांचे सगळे लक्ष आता लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवर आहे. त्यांना सरकार आणि अध्यक्षपदाची चिंता आहे. पंतप्रधान मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत. हे सरकार चालवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहेत, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.

दरम्यान, पंतप्रधान जनतेत भीती निर्माण करून सरकार चालवत आहेत. मात्र, जनता आता घाबरत नाही. वाजपेयी किंवा मनमोहन सिंग असते, तर काहीतरी होऊ शकले असते. विनम्रता, सन्मान आणि प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यात होती. मात्र, नरेंद्र मोदी या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, या शब्दांत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालCentral Governmentकेंद्र सरकार