शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

Rahul Gandhi: “मोदानी मॉडल, आधी लुटा अन् मग कोणत्याही शिक्षेशिवाय सुटा”; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 17:15 IST

Rahul Gandhi: विरोधकांच्या मागे ईडी-सीबीआयची चौकशी लावली जाते. मित्रांची मात्र सुटका केली जाते, अशी टीका राहुल गांधींनी केली.

Rahul Gandhi:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सातत्याने भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. संसदेत बोलू दिले जात नसल्याप्रकरणीही राहुल गांधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता मेहुल चोक्सीला इंटरपोल यादीतून वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदानी मॉडेल असल्याचा खोचक टोला लगावला आहे. 

राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. मेहुल चोक्सीला इंटरपोलच्या वाँटेड यादीतून वगळण्यात आले असून, जगात कुठेही आता ते फिरू शकतात, अशा आशयाच्या बातमीचा संदर्भ राहुल गांधी यांनी दिला आहे. यावरून विरोधकांच्या मागे ईडी-सीबीआयची चौकशी लावली जाते. मात्र, मित्रांची सुटका केली जाते. हे मोदानी मॉडेल असून, याचा अर्थ आधी लुटा आणि त्यानंतर कोणतीही शिक्षा झाल्याशिवाय त्या प्रकरणातून मुक्त व्हा, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे.   

मेहुल चोक्सीची रेड कॉर्नर नोटीस रद्द 

इंटरपोलने मेहुल चोक्सी विरोधात 'रेड कॉर्नर' नोटीस जारी केली होती. भारतातून फरार झाल्यानंतर तब्बल १० महिन्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आली होती. त्याचवर्षी चोक्सीने अँटिग्वा तसेच बारबुडाचे नागरिकत्व स्वीकारले होते. मेहुल चोक्सीने या रेड कॉर्नर नोटिसीला आव्हान दिले होते आणि हे प्रकरण राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा केला होता. मेहुल चोक्सीने आपल्या याचिकेत भारतातील तुरुंगातील परिस्थिती, त्याची वैयक्तिक सुरक्षा आणि आरोग्य यासारखे मुद्देही मांडले होते. चोक्सीच्या याचिकेनंतर हे प्रकरण पाच सदस्यीय इंटरपोल समितीच्या कोर्टात गेले. या समितीला कमिशन फॉर कंट्रोल फाइल्स म्हणतात. सुनावणीनंतर या समितीने रेड कॉर्नर नोटीस रद्द केल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी, नीरव मोदी, मेहुलभाईसारख्या उद्योगपती मित्रांसाठीच काम करतात. देशातील १४० कोटी जनतेसाठी नाही हे आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत, हे सरकारच ‘हम दो, हमारे दो’चे सरकार आहे. एकीकडे राहुल गांधी देशाची लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत, जनतेचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारत आहेत पण मोदी सरकार मात्र त्यांना काहीही करून अडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि भ्रष्ट उद्योगपतींना मात्र अभय दिले जात आहे. ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’, या म्हणीसारखा मोदी सरकारचा कारभार आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार