शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

केवळ 'या' दोनच शब्दांत केंद्रीय निवडणूक आयोगावर राहुल गांधीची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 09:14 IST

Rahul Gandhi on Election Commission: केवळ दोन शब्दांचे ट्विट करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीकेचे आसूड ओढले आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी यांची निवडणूक आयोगावर टीकाट्विटरच्या माध्यमातून साधला निशाणागेले दोन दिवस राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

नवी दिल्ली : आताच्या घडीला पश्चिम बंगाल आणि आसामसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडला. केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी येथील प्रचार जोर धरू लागला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. केवळ दोन शब्दांचे ट्विट करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीकेचे आसूड ओढले आहे. (Rahul Gandhi on Election Commission)

राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर टीका केली आहे. Election “Commission” असे केवळ दोन शब्द राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहेत. राहुल गांधी यांच्या आधी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले होते. पश्चिम बंगालमध्ये एका भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम यंत्र आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये प्रचार जोमात, अर्थव्यवस्था कोमात; रोजगारातही मोठी घट

कृषी कायदे रद्द करायला भाग पाडू

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हल्ल्याची शिकवण देतो, तर अहिंसात्मक सत्याग्रह शेतकऱ्यांना निर्भय बनवितो, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. RSS चा एकजुटीने मुकाबला करून तीन कृषी कायदे केंद्रातील मोदी सरकारला रद्द करायला भाग पाडू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या गाझिपूर, सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांकडून तिन्ही कायद्यांना कडाडून विरोध केला जात असून, किमान आधारभूत किंमत या कायद्यामुळे संपुष्टात येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. या कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या संपून शेतकऱ्यांना पूर्णत: उद्योगपतींच्या दयेवर अवलंबून राहावे लागेल, अशी भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेस