शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

“तरुणांनो लिहून घ्या! मोदींना रोजगार द्यायचे नाहीत, गॅरंटीचे खोटे दावे करतायत”: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 15:53 IST

Rahul Gandhi Vs PM Narendra Modi: १५ प्रमुख सरकारी विभागांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेतस याचे उत्तर केंद्र सरकारकडे आहे का? असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.

Rahul Gandhi Vs PM Narendra Modi: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. अनेक पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. देशातील बेरोजगारीवरून राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत केंद्र सरकारवर टीका केली.

देशातील तरुणांनो, एक गोष्ट लक्षात घ्या! नरेंद्र मोदींचा हेतू रोजगार देण्याचा नाही. नवीन पदे निर्माण करणे तर दूरच, केंद्र सरकारच्या रिक्त पदांवरही भरती केली जात नाही. केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीचा विचार केला तर ७८ विभागांमध्ये ९ लाख ६४ हजार पदे रिक्त आहेत. महत्त्वाच्या खात्यांवर नजर टाकली तर रेल्वेत २.९३ लाख, गृह मंत्रालयात १.४३ लाख आणि संरक्षण मंत्रालयात २.६४ लाख पदे रिक्त आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

१५ प्रमुख विभागांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा जास्त पदे का रिक्त आहेत याचे उत्तर केंद्र सरकारकडे आहे का? गॅरंटीचे खोटे दावे करणाऱ्या पंतप्रधानांच्याच कार्यालयात मोठ्या प्रमाणात अत्यंत महत्त्वाची पदे का रिक्त आहेत? कायमस्वरूपी नोकऱ्या देणे हे ओझे समजणारे भाजपा सरकार सातत्याने कंत्राटी पद्धतीला प्रोत्साहन देत आहे, जिथे ना सुरक्षा, ना सन्मान, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

रिक्त पदे हा देशातील तरुणांचा हक्क असून, भरती प्रक्रियेसाठी आम्ही ठोस योजना तयार केली आहे. भारताचा संकल्प आहे की, आम्ही तरुणांसाठी नोकऱ्यांचे बंद दरवाजे उघडू. बेरोजगारीचा काळा काळ दूर होऊन तरुणांच्या भाग्याचा सूर्योदय होणार आहे, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी