शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : "पंतप्रधान मोदी तुमचे अश्रू पुसायला आले नाहीत; भाजपा, RSS साठी मणिपूर देशाचा भाग नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 19:44 IST

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधींनी इम्फाळच्या बोथलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमधून 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्दे लोकसभा निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी आणावेत, अशी काँग्रेसची इच्छा आहे. ही यात्रा 67 दिवसांत जवळपास 110 जिल्ह्यांतून 6,700 किलोमीटरहून अधिक अंतर प्रवास करणार आहे.

यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधींनी इम्फाळच्या बोथलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. "मी 2004 पासून राजकारणात आहे, मी पहिल्यांदा भारतातील अशा राज्यात गेलो होतो जिथे शासन व्यवस्था कोलमडली होती, ज्याला आपण मणिपूर म्हणत होतो ते आता मणिपूर राहिलेले नाही... पण पंतप्रधान तुमचे अश्रू पुसण्यासाठी आले आहेत. तुम्हाला आपुलकीने जवळ घ्यायला आले नाहीत. कदाचित भाजपा आणि आरएसएससाठी मणिपूर हा देशाचा भाग नाही" असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. 

"तुम्ही ज्याला महत्त्व दिलं ते गमावलं आहे. पण आम्ही तुम्ही ज्याला महत्त्व दिलं ते पुन्हा शोधू आणि तुमच्याकडे परत आणू. मणिपूरच्या लोकांच्या वेदना आम्हाला समजतात. आपण ज्या जखमा, नुकसान आणि दु:ख सहन केलं ते आम्हाला समजतं. आम्ही तुम्हाला वचन देतो की तुम्ही ज्याला महत्त्व दिलं आहे ते आम्ही परत आणू, आम्ही सद्भाव, शांतता, स्नेह परत आणू, ज्यासाठी हे राज्य नेहमीच ओळखलं जातं."

"आम्ही भारत जोडो यात्रा सकाळी 6 वाजता सुरू करायचो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालायचो, शेवटी आमचं संध्याकाळी 20-25 मिनिटं भाषण व्हायचं पण आम्ही तुमचं म्हणणं 7-8 तास ऐकायचो. आमच्या मनात काय आहे ते आम्हाला सांगायचे नाही, आम्हाला तुमचं ऐकायचं आहे, तुमचं दुःख समजून घ्यायचं आहे. देशवासीयांवर मोठा अन्याय होत असल्याने 'भारत जोडो न्याय यात्रा' काढण्यात येत आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

"सद्भावना, समानता आणि बंधुता यांनी परिपूर्ण भविष्याचं दर्शन घडविण्याचं पक्षाचं उद्दिष्ट आहे. प्रवास कुठून सुरू करायचा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता? हा प्रवास मणिपूरपासूनच सुरू झाला पाहिजे, असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. मणिपूरमध्ये जे घडलं ते भाजपा आणि आरएसएसच्या द्वेषाच्या राजकारणाचं प्रतीक आहे" असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी