शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : "पंतप्रधान मोदी तुमचे अश्रू पुसायला आले नाहीत; भाजपा, RSS साठी मणिपूर देशाचा भाग नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 19:44 IST

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधींनी इम्फाळच्या बोथलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमधून 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्दे लोकसभा निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी आणावेत, अशी काँग्रेसची इच्छा आहे. ही यात्रा 67 दिवसांत जवळपास 110 जिल्ह्यांतून 6,700 किलोमीटरहून अधिक अंतर प्रवास करणार आहे.

यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधींनी इम्फाळच्या बोथलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. "मी 2004 पासून राजकारणात आहे, मी पहिल्यांदा भारतातील अशा राज्यात गेलो होतो जिथे शासन व्यवस्था कोलमडली होती, ज्याला आपण मणिपूर म्हणत होतो ते आता मणिपूर राहिलेले नाही... पण पंतप्रधान तुमचे अश्रू पुसण्यासाठी आले आहेत. तुम्हाला आपुलकीने जवळ घ्यायला आले नाहीत. कदाचित भाजपा आणि आरएसएससाठी मणिपूर हा देशाचा भाग नाही" असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. 

"तुम्ही ज्याला महत्त्व दिलं ते गमावलं आहे. पण आम्ही तुम्ही ज्याला महत्त्व दिलं ते पुन्हा शोधू आणि तुमच्याकडे परत आणू. मणिपूरच्या लोकांच्या वेदना आम्हाला समजतात. आपण ज्या जखमा, नुकसान आणि दु:ख सहन केलं ते आम्हाला समजतं. आम्ही तुम्हाला वचन देतो की तुम्ही ज्याला महत्त्व दिलं आहे ते आम्ही परत आणू, आम्ही सद्भाव, शांतता, स्नेह परत आणू, ज्यासाठी हे राज्य नेहमीच ओळखलं जातं."

"आम्ही भारत जोडो यात्रा सकाळी 6 वाजता सुरू करायचो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालायचो, शेवटी आमचं संध्याकाळी 20-25 मिनिटं भाषण व्हायचं पण आम्ही तुमचं म्हणणं 7-8 तास ऐकायचो. आमच्या मनात काय आहे ते आम्हाला सांगायचे नाही, आम्हाला तुमचं ऐकायचं आहे, तुमचं दुःख समजून घ्यायचं आहे. देशवासीयांवर मोठा अन्याय होत असल्याने 'भारत जोडो न्याय यात्रा' काढण्यात येत आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

"सद्भावना, समानता आणि बंधुता यांनी परिपूर्ण भविष्याचं दर्शन घडविण्याचं पक्षाचं उद्दिष्ट आहे. प्रवास कुठून सुरू करायचा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता? हा प्रवास मणिपूरपासूनच सुरू झाला पाहिजे, असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. मणिपूरमध्ये जे घडलं ते भाजपा आणि आरएसएसच्या द्वेषाच्या राजकारणाचं प्रतीक आहे" असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी