शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : "पंतप्रधान मोदी तुमचे अश्रू पुसायला आले नाहीत; भाजपा, RSS साठी मणिपूर देशाचा भाग नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 19:44 IST

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधींनी इम्फाळच्या बोथलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमधून 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्दे लोकसभा निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी आणावेत, अशी काँग्रेसची इच्छा आहे. ही यात्रा 67 दिवसांत जवळपास 110 जिल्ह्यांतून 6,700 किलोमीटरहून अधिक अंतर प्रवास करणार आहे.

यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधींनी इम्फाळच्या बोथलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. "मी 2004 पासून राजकारणात आहे, मी पहिल्यांदा भारतातील अशा राज्यात गेलो होतो जिथे शासन व्यवस्था कोलमडली होती, ज्याला आपण मणिपूर म्हणत होतो ते आता मणिपूर राहिलेले नाही... पण पंतप्रधान तुमचे अश्रू पुसण्यासाठी आले आहेत. तुम्हाला आपुलकीने जवळ घ्यायला आले नाहीत. कदाचित भाजपा आणि आरएसएससाठी मणिपूर हा देशाचा भाग नाही" असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. 

"तुम्ही ज्याला महत्त्व दिलं ते गमावलं आहे. पण आम्ही तुम्ही ज्याला महत्त्व दिलं ते पुन्हा शोधू आणि तुमच्याकडे परत आणू. मणिपूरच्या लोकांच्या वेदना आम्हाला समजतात. आपण ज्या जखमा, नुकसान आणि दु:ख सहन केलं ते आम्हाला समजतं. आम्ही तुम्हाला वचन देतो की तुम्ही ज्याला महत्त्व दिलं आहे ते आम्ही परत आणू, आम्ही सद्भाव, शांतता, स्नेह परत आणू, ज्यासाठी हे राज्य नेहमीच ओळखलं जातं."

"आम्ही भारत जोडो यात्रा सकाळी 6 वाजता सुरू करायचो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालायचो, शेवटी आमचं संध्याकाळी 20-25 मिनिटं भाषण व्हायचं पण आम्ही तुमचं म्हणणं 7-8 तास ऐकायचो. आमच्या मनात काय आहे ते आम्हाला सांगायचे नाही, आम्हाला तुमचं ऐकायचं आहे, तुमचं दुःख समजून घ्यायचं आहे. देशवासीयांवर मोठा अन्याय होत असल्याने 'भारत जोडो न्याय यात्रा' काढण्यात येत आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

"सद्भावना, समानता आणि बंधुता यांनी परिपूर्ण भविष्याचं दर्शन घडविण्याचं पक्षाचं उद्दिष्ट आहे. प्रवास कुठून सुरू करायचा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता? हा प्रवास मणिपूरपासूनच सुरू झाला पाहिजे, असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. मणिपूरमध्ये जे घडलं ते भाजपा आणि आरएसएसच्या द्वेषाच्या राजकारणाचं प्रतीक आहे" असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी