शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

Rahul Gandhi : "पंतप्रधान मोदी तुमचे अश्रू पुसायला आले नाहीत; भाजपा, RSS साठी मणिपूर देशाचा भाग नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 19:44 IST

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधींनी इम्फाळच्या बोथलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमधून 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्दे लोकसभा निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी आणावेत, अशी काँग्रेसची इच्छा आहे. ही यात्रा 67 दिवसांत जवळपास 110 जिल्ह्यांतून 6,700 किलोमीटरहून अधिक अंतर प्रवास करणार आहे.

यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधींनी इम्फाळच्या बोथलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. "मी 2004 पासून राजकारणात आहे, मी पहिल्यांदा भारतातील अशा राज्यात गेलो होतो जिथे शासन व्यवस्था कोलमडली होती, ज्याला आपण मणिपूर म्हणत होतो ते आता मणिपूर राहिलेले नाही... पण पंतप्रधान तुमचे अश्रू पुसण्यासाठी आले आहेत. तुम्हाला आपुलकीने जवळ घ्यायला आले नाहीत. कदाचित भाजपा आणि आरएसएससाठी मणिपूर हा देशाचा भाग नाही" असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. 

"तुम्ही ज्याला महत्त्व दिलं ते गमावलं आहे. पण आम्ही तुम्ही ज्याला महत्त्व दिलं ते पुन्हा शोधू आणि तुमच्याकडे परत आणू. मणिपूरच्या लोकांच्या वेदना आम्हाला समजतात. आपण ज्या जखमा, नुकसान आणि दु:ख सहन केलं ते आम्हाला समजतं. आम्ही तुम्हाला वचन देतो की तुम्ही ज्याला महत्त्व दिलं आहे ते आम्ही परत आणू, आम्ही सद्भाव, शांतता, स्नेह परत आणू, ज्यासाठी हे राज्य नेहमीच ओळखलं जातं."

"आम्ही भारत जोडो यात्रा सकाळी 6 वाजता सुरू करायचो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालायचो, शेवटी आमचं संध्याकाळी 20-25 मिनिटं भाषण व्हायचं पण आम्ही तुमचं म्हणणं 7-8 तास ऐकायचो. आमच्या मनात काय आहे ते आम्हाला सांगायचे नाही, आम्हाला तुमचं ऐकायचं आहे, तुमचं दुःख समजून घ्यायचं आहे. देशवासीयांवर मोठा अन्याय होत असल्याने 'भारत जोडो न्याय यात्रा' काढण्यात येत आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

"सद्भावना, समानता आणि बंधुता यांनी परिपूर्ण भविष्याचं दर्शन घडविण्याचं पक्षाचं उद्दिष्ट आहे. प्रवास कुठून सुरू करायचा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता? हा प्रवास मणिपूरपासूनच सुरू झाला पाहिजे, असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. मणिपूरमध्ये जे घडलं ते भाजपा आणि आरएसएसच्या द्वेषाच्या राजकारणाचं प्रतीक आहे" असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी