शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi in Amethi: 'जो सत्यासाठी लढतो तो हिंदू, जो द्वेष पसरवतो तो हिंदुत्ववादी'; अमेठीत राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 16:49 IST

Rahul Gandhi in Amethi: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी वाड्रा शनिवारी अमेठीत उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करताना पुन्हा एकदा हिंदू आणि हिंदुत्वच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

Rahul Gandhi in Amethi: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी वाड्रा शनिवारी अमेठीत उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करताना पुन्हा एकदा हिंदू आणि हिंदुत्वच्या मुद्द्यावर भाष्य केलं. हिंदूचा रस्ता सत्याग्रहाचा आहे, तर हिंदुत्ववादीचा रस्ता सत्ताग्रहाचा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. तसंच जो अन्यायाविरोधात लढतो तो हिंदू आणि जो हिंसा पसरवतो तो हिंदुत्त्ववादी असतो असंही ते म्हणाले. 

आज एका बाजूला हिंदू आहेत की जे सत्याची कास धरुन आहेत. तर दुसरीकडे हिंदुत्ववादी आहेत की जे द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत आणि असे लोक सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. या लोकांना आज हिंदुस्थानात हिंदू विरुद्ध हिंदुत्ववादी यांच्या लढाई निर्माण केली आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारनं आणले आहेत असं आधी सांगितलं गेलं आणि वर्षभरानं आज सरकारला कायदे मागे घ्यावे लागले. पंतप्रधान मोदींनी माफी मागितली. सरकारनं आजवर जे काही कायदे आणले मग ते नोटाबंदी असो किंवा मग जीएसटी यातून कोणताही फायदा सामान्यांना झालेला नाही. मग हे कायदे काही मोजक्या उद्योगपतींसाठी आणले होते का? असा सवाल आम्ही उपस्थित करत आलो आहोत, असंही राहुल गांधी म्हणाले. 

चीननं दिल्लीच्या क्षेत्राफळाऐवढी जमीन बळकावलीलडाखमध्ये चीननं दिल्लीच्या क्षेत्राफळाएवढी भारताच्या अधिपत्याखालील जमीन बळकावली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. चीननं भारताची जमीन बळकावली पण मोदींनी काहीच केलं नाही किंवा काही बोलले सुद्धा नाहीत. जेव्हा त्यांना याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी चीननं अशी कोणतीच जमीन बळकावली नसल्याचं म्हटलं. पण संरक्षण मंत्रालयानं चीननं जमीन बळकावली असल्याचं मान्य केलं, असं राहुल गांधी म्हणाले. 

बेरोजगारी आणि महागाईवर पंतप्रधान गप्प का?देशात आज बेरोजगारी आणि महागाई हेच दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. याच मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी आज गप्प का? सरकार आज या दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार नाही. नुकतंच मोदी एकटे गंगास्नान करुन आले. पण देशातील तरुणांना रोजगार कसा देणार हे काही ते आजवर सांगू शकलेले नाहीत. देशातील तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत? महागाई इतक्या वेगानं का वाढते आहे? याची उत्तरं पंतप्रधानांकडे नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीamethi-pcअमेठीPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपा