शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Rahul Gandhi in Amethi: 'जो सत्यासाठी लढतो तो हिंदू, जो द्वेष पसरवतो तो हिंदुत्ववादी'; अमेठीत राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 16:49 IST

Rahul Gandhi in Amethi: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी वाड्रा शनिवारी अमेठीत उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करताना पुन्हा एकदा हिंदू आणि हिंदुत्वच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

Rahul Gandhi in Amethi: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी वाड्रा शनिवारी अमेठीत उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करताना पुन्हा एकदा हिंदू आणि हिंदुत्वच्या मुद्द्यावर भाष्य केलं. हिंदूचा रस्ता सत्याग्रहाचा आहे, तर हिंदुत्ववादीचा रस्ता सत्ताग्रहाचा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. तसंच जो अन्यायाविरोधात लढतो तो हिंदू आणि जो हिंसा पसरवतो तो हिंदुत्त्ववादी असतो असंही ते म्हणाले. 

आज एका बाजूला हिंदू आहेत की जे सत्याची कास धरुन आहेत. तर दुसरीकडे हिंदुत्ववादी आहेत की जे द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत आणि असे लोक सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. या लोकांना आज हिंदुस्थानात हिंदू विरुद्ध हिंदुत्ववादी यांच्या लढाई निर्माण केली आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारनं आणले आहेत असं आधी सांगितलं गेलं आणि वर्षभरानं आज सरकारला कायदे मागे घ्यावे लागले. पंतप्रधान मोदींनी माफी मागितली. सरकारनं आजवर जे काही कायदे आणले मग ते नोटाबंदी असो किंवा मग जीएसटी यातून कोणताही फायदा सामान्यांना झालेला नाही. मग हे कायदे काही मोजक्या उद्योगपतींसाठी आणले होते का? असा सवाल आम्ही उपस्थित करत आलो आहोत, असंही राहुल गांधी म्हणाले. 

चीननं दिल्लीच्या क्षेत्राफळाऐवढी जमीन बळकावलीलडाखमध्ये चीननं दिल्लीच्या क्षेत्राफळाएवढी भारताच्या अधिपत्याखालील जमीन बळकावली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. चीननं भारताची जमीन बळकावली पण मोदींनी काहीच केलं नाही किंवा काही बोलले सुद्धा नाहीत. जेव्हा त्यांना याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी चीननं अशी कोणतीच जमीन बळकावली नसल्याचं म्हटलं. पण संरक्षण मंत्रालयानं चीननं जमीन बळकावली असल्याचं मान्य केलं, असं राहुल गांधी म्हणाले. 

बेरोजगारी आणि महागाईवर पंतप्रधान गप्प का?देशात आज बेरोजगारी आणि महागाई हेच दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. याच मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी आज गप्प का? सरकार आज या दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार नाही. नुकतंच मोदी एकटे गंगास्नान करुन आले. पण देशातील तरुणांना रोजगार कसा देणार हे काही ते आजवर सांगू शकलेले नाहीत. देशातील तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत? महागाई इतक्या वेगानं का वाढते आहे? याची उत्तरं पंतप्रधानांकडे नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीamethi-pcअमेठीPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपा