शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Rahul Gandhi in Amethi: 'जो सत्यासाठी लढतो तो हिंदू, जो द्वेष पसरवतो तो हिंदुत्ववादी'; अमेठीत राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 16:49 IST

Rahul Gandhi in Amethi: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी वाड्रा शनिवारी अमेठीत उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करताना पुन्हा एकदा हिंदू आणि हिंदुत्वच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

Rahul Gandhi in Amethi: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी वाड्रा शनिवारी अमेठीत उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करताना पुन्हा एकदा हिंदू आणि हिंदुत्वच्या मुद्द्यावर भाष्य केलं. हिंदूचा रस्ता सत्याग्रहाचा आहे, तर हिंदुत्ववादीचा रस्ता सत्ताग्रहाचा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. तसंच जो अन्यायाविरोधात लढतो तो हिंदू आणि जो हिंसा पसरवतो तो हिंदुत्त्ववादी असतो असंही ते म्हणाले. 

आज एका बाजूला हिंदू आहेत की जे सत्याची कास धरुन आहेत. तर दुसरीकडे हिंदुत्ववादी आहेत की जे द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत आणि असे लोक सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. या लोकांना आज हिंदुस्थानात हिंदू विरुद्ध हिंदुत्ववादी यांच्या लढाई निर्माण केली आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारनं आणले आहेत असं आधी सांगितलं गेलं आणि वर्षभरानं आज सरकारला कायदे मागे घ्यावे लागले. पंतप्रधान मोदींनी माफी मागितली. सरकारनं आजवर जे काही कायदे आणले मग ते नोटाबंदी असो किंवा मग जीएसटी यातून कोणताही फायदा सामान्यांना झालेला नाही. मग हे कायदे काही मोजक्या उद्योगपतींसाठी आणले होते का? असा सवाल आम्ही उपस्थित करत आलो आहोत, असंही राहुल गांधी म्हणाले. 

चीननं दिल्लीच्या क्षेत्राफळाऐवढी जमीन बळकावलीलडाखमध्ये चीननं दिल्लीच्या क्षेत्राफळाएवढी भारताच्या अधिपत्याखालील जमीन बळकावली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. चीननं भारताची जमीन बळकावली पण मोदींनी काहीच केलं नाही किंवा काही बोलले सुद्धा नाहीत. जेव्हा त्यांना याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी चीननं अशी कोणतीच जमीन बळकावली नसल्याचं म्हटलं. पण संरक्षण मंत्रालयानं चीननं जमीन बळकावली असल्याचं मान्य केलं, असं राहुल गांधी म्हणाले. 

बेरोजगारी आणि महागाईवर पंतप्रधान गप्प का?देशात आज बेरोजगारी आणि महागाई हेच दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. याच मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी आज गप्प का? सरकार आज या दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार नाही. नुकतंच मोदी एकटे गंगास्नान करुन आले. पण देशातील तरुणांना रोजगार कसा देणार हे काही ते आजवर सांगू शकलेले नाहीत. देशातील तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत? महागाई इतक्या वेगानं का वाढते आहे? याची उत्तरं पंतप्रधानांकडे नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीamethi-pcअमेठीPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपा