शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

काँग्रेसला धक्का की काँग्रेसचा धक्का?; तीन प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्यांनी खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 12:29 IST

तीन दिवसांमध्ये तीन राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले, त्यामुळं काँग्रेसला धक्का दिला की काँग्रेसला धक्का?

नवी दिल्ली - गेल्या तीन दिवसांत तीन राज्यांतील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले  आहे. रविवारी 17 तारखेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या महाधिवेशनामध्ये पूर्वापार चालत आलेली पक्षातील संस्कृती मोडीत काढण्याचा नारा दिला होता. त्यानंतर तीन दिवसांमध्ये तीन राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळं काँग्रेसला धक्का दिला की काँग्रेसने त्यांना धक्का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली नव्या टीमच्या लाँचिंगसाठी मार्ग मोकळा केला जातोय का?  

2012 च्या निवडणूकीच्या तुलनेत 2018मध्ये झालेल्या गुजरात निवडणूकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. पक्षाला चांगले यश मिळवून देण्यात प्रदेशाध्यक्षांचा सिंहाचा वाटा होता. तरीही सोमवारी भरतसिंह सोळंकी यांनी गुजरातच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काल गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक नाईक यांनीही राजीनामा दिला. हे राजीनामा सत्र गुजरात, गोवा त्यानंतर उत्तरप्रदेशमध्येही गेलं.  उत्तरप्रदेश राज्याच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राज बब्बर यांनी राजीनामा दिला आहे. उत्तरप्रदेश मधील नव्या चेहऱ्याला किंवा युवा काँग्रेस उमेदवाराला राज्याचे अध्यक्षपद मिळण्याची शक्याता आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, काल रात्री उशीरा राज बब्बर यांनी राजीनामा दिला आहे. राज बब्बरकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.  तर उत्तरप्रदेश काँग्रेसने यावर प्रतिक्रिया देणं टाळले. 

राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस वर्किंग कमिटीची नवी रचनाही अपेक्षित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नव्या वर्किंग कमिटीत 25 टक्के जागा 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना दिल्या जाण्याची शक्यता आहे. वर्किंग कमिटीत 33 टक्के महिलांना स्थान मिळावं असाही प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस