शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

५०० रुपयांत गॅस देऊ, दिल्लीत काँग्रेसचे आश्वासन; ३०० युनिटपर्यंतची वीजही मिळणार मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 05:30 IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांत जनतेने आम्हाला विजयी केले तर दिल्ली शहरातील नागरिकांना ५०० रुपयांमध्ये सीएनजी सिलिंडर देण्याची तसेच रेशन कीट व ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे आश्वासन काँग्रेसने गुरुवारी दिले. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव उपस्थित होते.

ए. रेवंथ रेड्डी म्हणाले की, काँग्रेसने दिलेल्या पाच हमी दिल्लीत सत्तेत आल्यानंतर नक्की पूर्ण करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल या दोघांनीही दिल्लीच्या विकासासाठी काहीही काम केलेले नाही. काँग्रेसने प्यारी दीदी योजनेद्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला २५०० रुपयांची मदत, जीवन रक्षण योजनेद्वारे नागरिकांना २५ लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, सुशिक्षित बेरोजगारांना वर्षभराच्या काळात दरमहा ८५०० रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे, असे रेवंथ रेड्डी यांनी सांगितले.

स्मृती इराणी यांना भाजपने मैदानात उतरविलेच नाहीमाजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविणार असल्याच्या चर्चेला गुरुवारी भाजपने उमेदवारांची चौथी यादी जाहीर करताच पूर्णविराम मिळाला. भाजपने युती धर्माचे पालन करीत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. पक्षाने ६८ जागांवर उमेदवार दिले असून, जनता दल युनायटेड व लोकजन शक्ती पक्षाला प्रत्येकी एक जागा दिली आहे.

एआयचा जबाबदारीने वापर व्हावा : निवडणूक आयोगनिवडणूक प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर व मतदारांना प्रभावित करण्याची तंत्रज्ञानाची क्षमता या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी दिशानिर्देश जारी केले.एआयपासून तयार केलेल्या सामग्रीचा वापर करताना पारदर्शकतेचे व जबाबदारीचे भान ठेवण्याचे निर्देश आयोगाने राजकीय पक्षांना दिले आहेत. प्रचार जाहिराती किंवा सामग्रीचा प्रसार करताना अस्वीकरणाचा (डिस्क्लेमर) देखील समावेश करावा लागणार असल्याचे आयोगाच्या दिशानिर्देशात म्हटले आहे. 

केंद्राने माफी मागावीदिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली. त्याबद्दल केंद्र सरकारने माफी मागावी, अशी मागणी आपचे नेते संजय सिंह यांनी केली आहे. केजरीवाल व आपच्या अन्य काही नेत्यांना अवैध पद्धतीने अटक केली होती, असे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसdelhi electionदिल्ली निवडणूक