शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

५०० रुपयांत गॅस देऊ, दिल्लीत काँग्रेसचे आश्वासन; ३०० युनिटपर्यंतची वीजही मिळणार मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 05:30 IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांत जनतेने आम्हाला विजयी केले तर दिल्ली शहरातील नागरिकांना ५०० रुपयांमध्ये सीएनजी सिलिंडर देण्याची तसेच रेशन कीट व ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे आश्वासन काँग्रेसने गुरुवारी दिले. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव उपस्थित होते.

ए. रेवंथ रेड्डी म्हणाले की, काँग्रेसने दिलेल्या पाच हमी दिल्लीत सत्तेत आल्यानंतर नक्की पूर्ण करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल या दोघांनीही दिल्लीच्या विकासासाठी काहीही काम केलेले नाही. काँग्रेसने प्यारी दीदी योजनेद्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला २५०० रुपयांची मदत, जीवन रक्षण योजनेद्वारे नागरिकांना २५ लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, सुशिक्षित बेरोजगारांना वर्षभराच्या काळात दरमहा ८५०० रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे, असे रेवंथ रेड्डी यांनी सांगितले.

स्मृती इराणी यांना भाजपने मैदानात उतरविलेच नाहीमाजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविणार असल्याच्या चर्चेला गुरुवारी भाजपने उमेदवारांची चौथी यादी जाहीर करताच पूर्णविराम मिळाला. भाजपने युती धर्माचे पालन करीत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. पक्षाने ६८ जागांवर उमेदवार दिले असून, जनता दल युनायटेड व लोकजन शक्ती पक्षाला प्रत्येकी एक जागा दिली आहे.

एआयचा जबाबदारीने वापर व्हावा : निवडणूक आयोगनिवडणूक प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर व मतदारांना प्रभावित करण्याची तंत्रज्ञानाची क्षमता या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी दिशानिर्देश जारी केले.एआयपासून तयार केलेल्या सामग्रीचा वापर करताना पारदर्शकतेचे व जबाबदारीचे भान ठेवण्याचे निर्देश आयोगाने राजकीय पक्षांना दिले आहेत. प्रचार जाहिराती किंवा सामग्रीचा प्रसार करताना अस्वीकरणाचा (डिस्क्लेमर) देखील समावेश करावा लागणार असल्याचे आयोगाच्या दिशानिर्देशात म्हटले आहे. 

केंद्राने माफी मागावीदिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली. त्याबद्दल केंद्र सरकारने माफी मागावी, अशी मागणी आपचे नेते संजय सिंह यांनी केली आहे. केजरीवाल व आपच्या अन्य काही नेत्यांना अवैध पद्धतीने अटक केली होती, असे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसdelhi electionदिल्ली निवडणूक