शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

"घरात मुलगा आहे पण लढू शकत नाही"'; प्रियंका गांधींच्या घोषणेची स्मृती इराणींनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 11:16 IST

Smriti Irani And Congress Priyanka Gandhi : स्मृती इराणी यांनी राहुल गांधीसह समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेसच्या नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रियंका गांधी यांच्या "मी मुलगी आहे आणि मी लढू शकते" या विधानाची खिल्ली उडवत निशाणा साधला आहे. तसेच "घरात मुलगा आहे (राहुल गांधी), पण लढू शकत नाही" असं म्हणत स्मृती इराणी यांनी राहुल यांना सणसणीत टोला लगावला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात इराणी यांनी राहुल गांधीसह समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 

स्मृती इराणी यांनी "उत्तर प्रदेशमधील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल अशी आम्हाला आशा आहे. तसेच या निवडणुकीत धोरण आणि विकास आणि लोकशाही मजबूत करण्यावर चर्चा होईल" असं म्हटलं आहे. महिला उमेदवारांना 40 टक्के तिकिटे देण्याच्या प्रियंका गांधींच्या प्रस्तावावर इराणी यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. "याचा अर्थ त्यांना 60 टक्के तिकिटे महिलांना द्यायची नाहीत असा होतो. राजकारणात आणि लोकशाहीत लोकांनी प्रयत्न करू नये, असे माझे म्हणणे नाही. जय-पराजय हा राजकारणाचा भाग आहे" असं देखील म्हटलं आहे. 

"देशातील नागरिक राजकीय विश्लेषण करू शकत नाहीत"

"2014 मध्ये माझाही पराभव झाला पण तुमच्या प्रयत्नांवर लोकांचा किती विश्वास आहे हा प्रश्न आहे. तसेच महिला नेत्यांकडून फक्त समाजातील महिला सदस्यांसाठी काम करण्याची अपेक्षा करू नये" असंही इराणी यांनी म्हटलं आहे. भाजपा ध्रुवीकरणाच्या फॉर्म्युल्यावर काम करते का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, "या देशातील नागरिक राजकीय विश्लेषण करू शकत नाहीत आणि कोणत्यातरी फॉर्म्युल्यावर मतदान करतील, असे तुम्हाला वाटते का?" असं म्हटलं आहे. 

अखिलेश यादव यांच्या विधानाचा इराणींनी घेतला समाचार 

अखिलेश यादव यांनी 31 ऑक्टोबरला एका कार्यक्रमात महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना बॅरिस्टर झाले आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि कधीही मागे हटले नाही, असं विधान केलं होतं. अखिलेश यादव यांच्या विधानाचा समाचार घेत इराणी यांनी ही तुलना पुन्हा दर्शवते की, "मुलं आहेत, पण ते लढू शकत नाहीत. सरदार पटेल अतुलनीय आहेत. पाचशे संस्थानांमध्ये एकतेची भावना जागृत करण्याचे श्रेय सरदार पटेलांना जाते. त्यांचे व्यक्तिमत्व किती महान असेल याची तुम्ही कल्पना करू शकता" असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीPriyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस