शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Priyanka Gandhi : "डाळीची किंमत सामान्य लोकांना माहितीय; मंत्री, अधिकारी अयोध्येतील जमिनीची किंमत शोधण्यात व्यस्त"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 10:02 IST

Congress Priyanka Gandhi : प्रियंका गांधी यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषीमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

योगी आदित्यनाथ सरकारमधील कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांनी डाळींच्या किमतीवर विधान केलं आहे. ज्यामुळे राजकारण तापलं आहे. त्यांच्या या विधानावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याच दरम्यान प्रियंका गांधी यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषीमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे 

"पीठ आणि डाळीची किंमत तर सर्वसामान्य लोकांना माहीत आहे, मंत्री आणि अधिकारी अयोध्येतील जमिनीची किंमत शोधण्यात व्यस्त होते" असं म्हणत प्रियंका गांधी यांनी खोचक टोला लगावला आहे. तसेच त्यांनी यासोबतच एक पोस्टर देखील शेअर केलं आहे. ज्यामध्ये एका रिपोर्टचा हवाला देण्यात आला आहे. 

"२०१९ मध्ये रामजन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिराच्या शेजारील २५ गावांमध्ये २५०० हून अधिक प्लॉटची खरेदी, विक्री केली गेली. ज्यामध्ये जमीन विकत घेतलेल्या अनेक लोकांच्या अशा लिंक उघड झाल्या जे एकतर राजकारणी किंवा अधिकारी किंवा स्थानिक नेते होते."

"यासोबतच डाळींचा भाव १०० रुपये किलो आहे असं म्हणून हसणारे मंत्री सूर्य प्रताप शाही यांनी ही दराची यादी पाहावी" असं पोस्टरमध्ये म्हटलं आहे. तूर डाळ १८० रुपये किलो, राजमा १७० रुपये किलो, काळे उडीद १३० रुपये किलो, मूग डाळ १२० रुपये, असा बाजारात भाव आहे" असंही म्हटलं आहे.

यूपीच्या कृषीमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, डाळीचे दर १०० रुपये किलोपेक्षा जास्त नाहीत. १०० रुपये किलो दराने डाळ उपलब्ध आहे. यावर पत्रकारांनी त्यांना १०० रुपये किलोची डाळ कुठे मिळते?, असा प्रश्न विचारला असता मंत्री सूर्य प्रताप शाही हसू लागले. प्रियांका गांधी यांनी कृषीमंत्र्यांच्या या विधानावर आता जोरदार निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश