शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

“भाजपाच्या राज्यात संसद, सीमाभाग, रस्ते, समाज काहीही सुरक्षित नाही”: प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 16:36 IST

Priyanka Gandhi News: संसद सुरक्षा त्रुटी, विरोधी खासदारांचे निलंबन आणि मणिपूर हिंसाचारावरून प्रियंका गांधींनी भाजपावर टीका केली.

Priyanka Gandhi News( Marathi News ): संसद सुरक्षेतील त्रुटी आणि लोकसभेतील घुसखोरी यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात यासंदर्भात निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या मागणीवरून संसदेत झालेल्या गोंधळाप्रकरणी विरोधी पक्षातील १४६ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यावरून विरोधी पक्ष केंद्रावर सातत्याने टीका करताना दिसत आहे. यातच आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मणिपूरमधील एका घटनेचा उल्लेख करत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

विरोधकांनी संसद परिसर ते विजय चौकतपर्यंत पदयात्रा काढत खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईविरोधात निषेध केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी टीव्हीवर बोलतात, रेडिओवर बोलतात, पण सभागृहात बोलत नाही. संसदेतील घुसखोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन द्यावे, हीच आमची मागणी आहे, असे सांगत मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रावर टीका केली. यानंतर प्रियंका गांधी यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमधून भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

भाजपाच्या राज्यात संसद, सीमाभाग, रस्ते, समाज काहीही सुरक्षित नाही

प्रियंका गांधी यांनी मणिपूरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये या हिंसाचारात बळी पडलेल्यांवर नातेवाइक अंत्यसंस्कार करताना दिसत आहेत. जरा विचार करा की, मणिपूर हिंसाचारात मारल्या गेलेल्या लोकांवर आठ महिन्यांनंतरच अंत्यसंस्कार करण्यात आले. मणिपूरबाबत संसदेत प्रश्न विचारला असता, सरकारने जबाबदारी घेण्याऐवजी विसंगत उत्तरे दिली. आता खुद्द पंतप्रधान ज्या संसदेत बसतात ती संसदही सुरक्षित राहिलेली नाही, तर सुमारे दीडशे खासदारांना प्रश्न विचारल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे.  भाजपाच्या राजवटीत संसद, सीमाभाग, रस्ते, समाज काहीही सुरक्षित नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही यावरुन भाजपावर जोरदार टीका करत कारवाई मागचे कारण सांगितले. संसदेचे सदस्य नसताना काही लोक सदनमध्ये आले, या लोकांना पास कुठून मिळाला. ते सदनमध्ये कसे आले? याबाबत सरकारकडून माहिती मिळण्याची आवश्यक्ता होती. सदनचा तो अधिकार होता, आम्ही स्टेटमेंटची मागणी केली होती तेच त्यांनी दिलेली नाही. यामुळेच सदनमधील सदस्यांना निलंबित केले, आजपर्यंत अशी गोष्ट कधीही झालेली नाही. विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष करुन काम करणे सुरू आहे. पण, देशाची जनता हे सर्व पाहत आहे. जी मिमिक्री केली ती सदनच्या बाहेर केली आहे. संसदेत बोलू दिले जात नाही. खासदारांनी सरकारला प्रश्न विचारले म्हणून त्यांना निलंबित केले. खासदारांचे असे निलंबन करणे चुकीचे आहे, अशी टीका शरद पवारांनी केली. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीManipur Violenceमणिपूर हिंसाचारParliamentसंसदlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस