शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

"काँग्रेससारखा पक्ष त्यांच्या वाईट दिवसांमध्ये जाणीवपूर्वक आमचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतोय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 17:18 IST

Congress Priyanka Gandhi And TMC : तृणमुलने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आमच्या पक्षाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 40 टक्के महिला उमेदवारांना तिकीट दिले जाईल. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी लखनऊमधील पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. याच दरम्यान तृणमुलने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आमच्या पक्षाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत निशाणा साधला आहे. तृणमुल काँग्रेसने (TMC) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. 

"ममता बॅनर्जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने या देशातील राजकारणात महिलांचा वाढता सहभाग निश्चित करण्यासाठी मार्ग दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी 40 टक्के जागा राखीव ठेवणारा आमचा पहिला पक्ष आहे" असं तृणमुल काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच "काँग्रेससारखा पक्ष त्यांच्या वाईट दिवसांमध्ये जाणीवपूर्वक आमचं (टीएमसी) अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. जर काँग्रेस गांभीर्यपूर्वक याबद्दल घोषणा करत असेल तर त्यांनी केवळ उत्तर प्रदेशमध्येच नाही तर इतर राज्यांमध्येही 40 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवाव्यात" असं देखील तृणमूलने म्हटलं आहे. 

"उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 40 टक्के जागा महिलांसाठी राखीव"

पत्रकार परिषदेत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष महिला 40 टक्के महिला उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार. यासोबतच त्यांनी महिला समाजसेविका, शिक्षिका, महिला पत्रकार आणि इतर सेवांशी संबंधित महिलांना राजकारणात येण्याचे आवाहनही केले आहे. 

माध्यमांशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, पक्षाने यूपीतील शोषित महिलांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. 'मी एक मुलगी आहे, मी लढू शकते' हा काँग्रेसचा नारा आहे. आपल्याला पुढे जायचे असेल तर महिलांना राजकारणात यावेच लागेल. महिलांना गुणवत्तेच्या आधारावर तिकीट दिले जाईल. याची सुरुवात 40 टक्क्यांपासून होत आहे. आगामी काळात 50 टक्के महिलांना तिकिटे दिली जाईल. इच्छुक असलेल्या कोणत्याही महिला त्यांच्या विधानसभेतून फॉर्म घेऊन अर्ज करू शकतात. काँग्रेस त्यांना निवडणूक लढवण्यास मदत करेल, असं प्रियंका म्हणाल्या. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसcongressकाँग्रेस