शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

२२ वर्षांपूर्वी झाली होती काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, या नेत्याने दिले होते सोनिया गांधींना आव्हान, असा लागला होता निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 16:26 IST

Congress: तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक होणार आहे. यापूर्वी २००० साली काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवड झाली होती. तेव्हा सोनिया गांधी यांना जितेंद्र प्रसाद यांनी आव्हान दिले होते. कशी होती ती निवडणूक जाणून घ्या. 

नवी दिल्ली - काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. २४ सप्टेंबरपासून उमेदवारांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू होणार आहे. तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक होणार आहे. यापूर्वी २००० साली काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवड झाली होती. तेव्हा सोनिया गांधी यांना जितेंद्र प्रसाद यांनी आव्हान दिले होते. कशी होती ती निवडणूक जाणून घ्या. 

२००० साली काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली होती. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीची दोन दशके पक्षामध्ये अध्यक्ष निवडीसाठी निवडणुकीची प्रथा होती. मात्र इंदिरा गांधी यांच्यानंतर ही प्रथा संपुष्टात आली होती. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपद आणि काँग्रेसचं अध्यक्षपद एकत्रितपणे सांभाळलं होतं. तर राजीव गांधी यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले होते.

गेल्या ५ दशकांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी केवळ दोन वेळा निवडणूक झाली आहे. पहिल्यांदा १९९७ मध्ये सीताराम केसरी यांनी शरद पवार आणि राजेश पायलट यांना पराभूत केले होते. तर २००० मध्ये सोनिया गांधी यांनी जितेंद्र प्रसाद यांचा पराभव करून विजय मिळवला होता. 

२००० साली जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली होती तेव्हा ही निवडणूक बिनविरोध होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी २९ ऑक्टोबर रोजी जितेंद्र प्रसाद यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली होती. जितेंद्र प्रसाद यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी कमिटीने दबाव आणला होता. मात्र जितेंद्र प्रसाद आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

जितेंद्र प्रसाद यांनी श्रीपेराम्बदूर येथून आपल्या प्रचार अभियानाची सुरुवात केली होती. मात्र ते जेव्हा चेन्नईत पोहोचले तेव्हा तिथे त्यांच्या स्वागतासाठी कुणीही आले नव्हते. त्यांनी संपूर्ण देशाचा दौरा केला. यादरम्यान, त्यांनी निवडणुकीत गडबड होण्याचा संशय  व्यक्त केला होता. मात्र त्यांच्या आरोपांकडे कुणीही लक्ष दिले नव्हते.

या निवडणुकीसाठी भरघोस मतदान झाले होते. दरम्यान, या निवडणुकीत सोनिया गांधी जिंकून येणार हे निश्चित होते. मात्र जितेंद्र प्रसाद यांना किती मतं मिळणार त्याबाबत उत्सुकता होती. या मतमोजणीत सोनिया गांधी यांना तब्बल ७ हजार ४४८ मते मिळाली. तर जितेंद्र प्रसाद यांना केवळ ९४ मतांवर समाधान मानावे लागले.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण