शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

२२ वर्षांपूर्वी झाली होती काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, या नेत्याने दिले होते सोनिया गांधींना आव्हान, असा लागला होता निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 16:26 IST

Congress: तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक होणार आहे. यापूर्वी २००० साली काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवड झाली होती. तेव्हा सोनिया गांधी यांना जितेंद्र प्रसाद यांनी आव्हान दिले होते. कशी होती ती निवडणूक जाणून घ्या. 

नवी दिल्ली - काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. २४ सप्टेंबरपासून उमेदवारांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू होणार आहे. तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक होणार आहे. यापूर्वी २००० साली काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवड झाली होती. तेव्हा सोनिया गांधी यांना जितेंद्र प्रसाद यांनी आव्हान दिले होते. कशी होती ती निवडणूक जाणून घ्या. 

२००० साली काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली होती. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीची दोन दशके पक्षामध्ये अध्यक्ष निवडीसाठी निवडणुकीची प्रथा होती. मात्र इंदिरा गांधी यांच्यानंतर ही प्रथा संपुष्टात आली होती. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपद आणि काँग्रेसचं अध्यक्षपद एकत्रितपणे सांभाळलं होतं. तर राजीव गांधी यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले होते.

गेल्या ५ दशकांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी केवळ दोन वेळा निवडणूक झाली आहे. पहिल्यांदा १९९७ मध्ये सीताराम केसरी यांनी शरद पवार आणि राजेश पायलट यांना पराभूत केले होते. तर २००० मध्ये सोनिया गांधी यांनी जितेंद्र प्रसाद यांचा पराभव करून विजय मिळवला होता. 

२००० साली जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली होती तेव्हा ही निवडणूक बिनविरोध होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी २९ ऑक्टोबर रोजी जितेंद्र प्रसाद यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली होती. जितेंद्र प्रसाद यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी कमिटीने दबाव आणला होता. मात्र जितेंद्र प्रसाद आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

जितेंद्र प्रसाद यांनी श्रीपेराम्बदूर येथून आपल्या प्रचार अभियानाची सुरुवात केली होती. मात्र ते जेव्हा चेन्नईत पोहोचले तेव्हा तिथे त्यांच्या स्वागतासाठी कुणीही आले नव्हते. त्यांनी संपूर्ण देशाचा दौरा केला. यादरम्यान, त्यांनी निवडणुकीत गडबड होण्याचा संशय  व्यक्त केला होता. मात्र त्यांच्या आरोपांकडे कुणीही लक्ष दिले नव्हते.

या निवडणुकीसाठी भरघोस मतदान झाले होते. दरम्यान, या निवडणुकीत सोनिया गांधी जिंकून येणार हे निश्चित होते. मात्र जितेंद्र प्रसाद यांना किती मतं मिळणार त्याबाबत उत्सुकता होती. या मतमोजणीत सोनिया गांधी यांना तब्बल ७ हजार ४४८ मते मिळाली. तर जितेंद्र प्रसाद यांना केवळ ९४ मतांवर समाधान मानावे लागले.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण