शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

२२ वर्षांपूर्वी झाली होती काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, या नेत्याने दिले होते सोनिया गांधींना आव्हान, असा लागला होता निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 16:26 IST

Congress: तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक होणार आहे. यापूर्वी २००० साली काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवड झाली होती. तेव्हा सोनिया गांधी यांना जितेंद्र प्रसाद यांनी आव्हान दिले होते. कशी होती ती निवडणूक जाणून घ्या. 

नवी दिल्ली - काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. २४ सप्टेंबरपासून उमेदवारांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू होणार आहे. तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक होणार आहे. यापूर्वी २००० साली काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवड झाली होती. तेव्हा सोनिया गांधी यांना जितेंद्र प्रसाद यांनी आव्हान दिले होते. कशी होती ती निवडणूक जाणून घ्या. 

२००० साली काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली होती. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीची दोन दशके पक्षामध्ये अध्यक्ष निवडीसाठी निवडणुकीची प्रथा होती. मात्र इंदिरा गांधी यांच्यानंतर ही प्रथा संपुष्टात आली होती. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपद आणि काँग्रेसचं अध्यक्षपद एकत्रितपणे सांभाळलं होतं. तर राजीव गांधी यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले होते.

गेल्या ५ दशकांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी केवळ दोन वेळा निवडणूक झाली आहे. पहिल्यांदा १९९७ मध्ये सीताराम केसरी यांनी शरद पवार आणि राजेश पायलट यांना पराभूत केले होते. तर २००० मध्ये सोनिया गांधी यांनी जितेंद्र प्रसाद यांचा पराभव करून विजय मिळवला होता. 

२००० साली जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली होती तेव्हा ही निवडणूक बिनविरोध होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी २९ ऑक्टोबर रोजी जितेंद्र प्रसाद यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली होती. जितेंद्र प्रसाद यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी कमिटीने दबाव आणला होता. मात्र जितेंद्र प्रसाद आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

जितेंद्र प्रसाद यांनी श्रीपेराम्बदूर येथून आपल्या प्रचार अभियानाची सुरुवात केली होती. मात्र ते जेव्हा चेन्नईत पोहोचले तेव्हा तिथे त्यांच्या स्वागतासाठी कुणीही आले नव्हते. त्यांनी संपूर्ण देशाचा दौरा केला. यादरम्यान, त्यांनी निवडणुकीत गडबड होण्याचा संशय  व्यक्त केला होता. मात्र त्यांच्या आरोपांकडे कुणीही लक्ष दिले नव्हते.

या निवडणुकीसाठी भरघोस मतदान झाले होते. दरम्यान, या निवडणुकीत सोनिया गांधी जिंकून येणार हे निश्चित होते. मात्र जितेंद्र प्रसाद यांना किती मतं मिळणार त्याबाबत उत्सुकता होती. या मतमोजणीत सोनिया गांधी यांना तब्बल ७ हजार ४४८ मते मिळाली. तर जितेंद्र प्रसाद यांना केवळ ९४ मतांवर समाधान मानावे लागले.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण