शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पुदुच्चेरी, केरळ आणि आसाम राज्यांचा पाहणी अहवाल कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 09:28 IST

पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी केल्या अनेक शिफारसी

मुंबई : पुदुच्चेरी, केरळ आणि आसाम या तीन राज्यांत काँग्रेसचा पराभव का झाला? यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींना दिल्लीत पाठवला आहे. गेले काही दिवस सातत्याने ते या तीनही राज्यातील विविध नेत्यांशी चर्चा करत होते. पश्चिम बंगालचा अहवाल अद्याप दिलेला नाही. या अहवालात पक्षसंघटना मजबूत करणे व निवडणूक व्यवस्थापनाच्या अनुषंगाने शिफारसी करण्यात आल्या आहेत.देशभरात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांची समीक्षा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी स्थापन केली होती. समितीत वरिष्ठ नेते सलमान खुर्शिद, माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी, व्हिन्सेंट पाला, खा. ज्योती मणी हे चार सदस्य होते. देशात नुकत्याच पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील या समितीने या पाचही राज्यांच्या निकालाचे विवेचन करून १५ दिवसांत अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सादर करावा, असे आदेश देण्यात आले होते.त्यानुसार चव्हाण यांनी तीनही राज्यातील पक्ष संघटनेच्या विविध नेत्यांशी चर्चा केली. निवडणुकीत जिंकलेले आणि पराभूत झालेले उमेदवार, संघटनेचे विविध नेते, तिकीट देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या छाननी समितीचे अध्यक्ष यांच्यासह समितीच्या पाचही सदस्यांनी दररोज किमान ५-६ तास वेळ देऊन संबंधित राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते, जिल्हाध्यक्ष आदींशी विस्तृत चर्चा केली. तीन राज्यातील सुमारे दीडशे व्यक्तींशी चर्चा करण्यात आली.या चर्चेदरम्यान संकलित झालेल्या माहितीच्या आधारे समितीने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या कामगिरीची कारणमीमांसा केली, काही निष्कर्ष काढले व त्याआधारे पक्षाला काही शिफारसी केल्या. याबाबत समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. हा अहवाल काँग्रेस पक्षाची संपत्ती असल्याने त्याबाबत अधिक बोलता येणार नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस