शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पुदुच्चेरी, केरळ आणि आसाम राज्यांचा पाहणी अहवाल कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 09:28 IST

पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी केल्या अनेक शिफारसी

मुंबई : पुदुच्चेरी, केरळ आणि आसाम या तीन राज्यांत काँग्रेसचा पराभव का झाला? यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींना दिल्लीत पाठवला आहे. गेले काही दिवस सातत्याने ते या तीनही राज्यातील विविध नेत्यांशी चर्चा करत होते. पश्चिम बंगालचा अहवाल अद्याप दिलेला नाही. या अहवालात पक्षसंघटना मजबूत करणे व निवडणूक व्यवस्थापनाच्या अनुषंगाने शिफारसी करण्यात आल्या आहेत.देशभरात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांची समीक्षा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी स्थापन केली होती. समितीत वरिष्ठ नेते सलमान खुर्शिद, माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी, व्हिन्सेंट पाला, खा. ज्योती मणी हे चार सदस्य होते. देशात नुकत्याच पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील या समितीने या पाचही राज्यांच्या निकालाचे विवेचन करून १५ दिवसांत अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सादर करावा, असे आदेश देण्यात आले होते.त्यानुसार चव्हाण यांनी तीनही राज्यातील पक्ष संघटनेच्या विविध नेत्यांशी चर्चा केली. निवडणुकीत जिंकलेले आणि पराभूत झालेले उमेदवार, संघटनेचे विविध नेते, तिकीट देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या छाननी समितीचे अध्यक्ष यांच्यासह समितीच्या पाचही सदस्यांनी दररोज किमान ५-६ तास वेळ देऊन संबंधित राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते, जिल्हाध्यक्ष आदींशी विस्तृत चर्चा केली. तीन राज्यातील सुमारे दीडशे व्यक्तींशी चर्चा करण्यात आली.या चर्चेदरम्यान संकलित झालेल्या माहितीच्या आधारे समितीने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या कामगिरीची कारणमीमांसा केली, काही निष्कर्ष काढले व त्याआधारे पक्षाला काही शिफारसी केल्या. याबाबत समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. हा अहवाल काँग्रेस पक्षाची संपत्ती असल्याने त्याबाबत अधिक बोलता येणार नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस