शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

CoronaVirus News : "…तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?"; पी चिदंबरम यांचा जोरदार हल्लाबोल, दिलं जाहीर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 12:51 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates P Chidambaram And Harsh Vardhan : काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी हर्षवर्धन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच जाहीर आव्हान दिलं आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात होण्यापूर्वीच राज्यांकडून कोरोनाच्या लसीच्या टंचाईचा मुद्दा लावून धरण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी लसींच्या तुटवड्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (corona vaccination in India)  देशातील विविध राज्यांना आतापर्यंत 16 कोटी लसी पुरवण्यात आल्या असून, त्यामधील 1 कोटी डोस राज्यांकडे शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अनेक राज्यांनी लसींचा मोठा तुटवडा असल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी हर्षवर्धन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच जाहीर आव्हान दिलं आहे.

पी चिदंबरम यांनी 1 मे रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची कसोटी असणार असल्याचं म्हटलं आहे. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत हल्लाबोल केला आहे. "आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची 1 मे रोजी कसोटी असेल. राज्यांकडे लसींचा मुबलक साठा असल्याचा त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा दावा हवेत उडून जाईल. कोणतंही राज्य 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी अद्याप तयार नाही. इतकंच नाही तर CoWin App ही सहकार्य करत नाही. जर लस नाही म्हणून 1 मे नंतर लसीकरण केंद्रांवरुन लोकांना घरी पाठवण्यात आलं तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?" असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर लसींचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत राज्यांना 16 कोटी डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत असं म्हटलं आहे. तसेच त्यामधील 15 कोटी लसींचा वापर झाला आहे. तर एक कोटी डोस शिल्लक आहेत. काही लाख डोस पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये उपलब्ध होतील. आतापर्यंत राज्यांना त्यांच्या क्षमतेनुसार लसीचा पुरवठा झाला नाही, असा एकही दिवस आलेला नाही असं देखील सांगितलं. यानंतर आता पी चिदंबरम यांनी कोरोना लसीकरणावरून टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस नेते पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी काही दिवसांपूर्वी मोदींना सणसणीत टोला लगावला होता. 

"एकदा सरकार म्हणतं लसीकरण मोहीम उत्सव; नंतर म्हणतं दुसरं युद्ध.. नेमकं काय आहे?", काँग्रेसचा सणसणीत टोला

लसीकरण मोहीम उत्सव आहे की युद्ध असा सवाल विचारला होता. तसेच मोदी सरकार लसींच्या पुरवठा आणि वाटपामधील आपलं मोठं अपयश लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे असं म्हणत हल्लाबोल केला होता. "एकदा सरकार म्हणतं की, लसीकरण मोहीम उत्सव आहे. दुसऱ्या दिवशी म्हणतं दुसरं युद्ध आहे. नेमकं काय आहे?" असं पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसेच "पंतप्रधानांनी पहिला लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा त्यांनी 21 दिवसांत युद्ध जिंकू असा दावा केला होता. यावेळी त्यांनी महाभारतातील युद्धाशी तुलना केली होती जे 18 दिवसांत जिंकलं होतं. त्याचं काय झालं?" असं देखील चिदंबरम यांनी म्हणत निशाणा साधला. "पोकळ अभिमान आणि अतिशयोक्ती आपल्याला कोरोनाविरोधात जिंकण्यास मदत करणार नाही. सरकार लसींच्या पुरवठा आणि वाटपामधील आपलं मोठं अपयश लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे" असा आरोप देखील त्यांनी केला होता.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसP. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेसIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या