शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

"जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत..." काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 19:15 IST

Congress : "पंतप्रधानांनी राज्यसभेत मणिपूरबद्दल जे सांगितले, ते वास्तवाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे."

Congress on PM Modi Speech: संसदेच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (3 जुलै) मणिपूर हिंसाचारावर भाष्य केले होते. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. मात्र, आता काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधानांच्या मणिपूरवरील वक्तव्यावर हल्लाबोल केला आहे. 

जयराम रमेश म्हणाले की, "पंतप्रधान मणिपूरच्या मुद्द्यावर गप्प का बसले? त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली नाही? त्यांनी खासदार आणि आमदारांशी का चर्चा केली नाही? त्यांनी यापूर्वीच या घटनेवर बोलायला हवे होते. ते वेगवेगळ्या देशांना भेटी देतात, पण त्यांना मणिपूरला जायला वेळ नाही. यावरुन पंतप्रधानांना परिस्थितीची कितीची चिंता नाही, असा संदेश जातो."

"पंतप्रधानांनी राज्यसभेत मणिपूरबद्दल जे सांगितले, ते वास्तवाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. मणिपूर 3 मे 2023 पासून जळत आहे. समुदायांमध्ये तणाव आणि हिंसाचार सुरू आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना राज्यात दोन तृतीयांशपेक्षा जास्त मते मिळाले, पण आजपर्यंत पंतप्रधानांनी मणिपूरचा दौरा केला नाही. मणिपूरचे लोक आजही पंतप्रधान का येत नाही, अशी विचारणा करतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातही मणिपूरचा फारसा उल्लेख नव्हता. हा दांभिकपणा आहे," अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसBJPभाजपाParliamentसंसद