शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

काँग्रेस खासदार राजीव सातव यांना गुजरात पोलिसांकडून बेदम मारहाण, दंगलीचा गुन्हा केला दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 04:40 IST

काँग्रेस पक्षाचे हिंगोलीचे खासदार व सौराष्ट्राचे प्रभारी राजीव सातव व अन्य चार काँग्रेस पदाधिका-यांना राजकोट पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

राजकोट : काँग्रेस पक्षाचे हिंगोलीचे खासदार व सौराष्ट्राचे प्रभारी राजीव सातव व अन्य चार काँग्रेस पदाधिका-यांना राजकोट पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या मारहाणीत सातव यांच्यासह हिंगोलीचे नगरसेवक अनिल लेनवानी, काँग्रेसचे जालना येथील कार्यकर्ते राजेंद्र राथ, अ. भा. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष कुंडल, नरेंद्र खबर हे कार्यकर्तेही जखमी झाले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी- मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याविरोधात राजकोट (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील राजगुरू यांची पोस्टर्स दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फाडली होती. त्याच ठिकाणी पुन्हा पोस्टर्स लावण्याकरिता इंद्रनील यांचे बंधू दीपगुरु गेले असता भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. दीपगुरु यांच्या जखमेवर टाके घालण्यात आले असून ते सध्या इस्पितळात आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेले इंद्रनीलयांनी मुख्यमंत्री रुपाणी यांच्या घरासमोर धरणे आंदोलन सुरूकेले.मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली व त्यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल केले. सातव हे शनिवारी रात्री प्रचारावरुन परतले तेव्हा त्यांच्या कानावर हा प्रकार गेल्याने ते पोलीस मुख्यालयात गेले. तेथे मीडिया मोठ्या संख्येने हजर होता.काँग्रेस उमेदवाराला सोडत नसल्याच्या निषेधार्थ सातव यांनी पोलिस मुख्यालयासमोरच ३० ते ३५ कार्यकर्त्यांसह धरणे धरले. तेथील पोलीस उपायुक्त वाघेला यांनी सातव व अन्य काही प्रमुख कार्यकर्त्यांना मुख्यालयात बोलावून त्यांना सराईत गुन्हेगार असल्यासारखी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यामध्ये सातवसह नगरसेवक लेनवानी यांना जबर मार लागला. राथ यांचा हात फ्रॅक्चर झाला.मारहाण केल्यावर पोलिसांनी या साºयांना आत नेऊन बसवले. एका पोलीस हवालदाराच्या हाताला इजा झाल्यामुळे तुमच्यावरही गुन्हा दाखल करावा लागेल, असे पोलिसांनी सातव यांना सांगितले. त्यावर राहुल गांधी यांच्यासह देशातील काँग्रेसचे सर्व नेते जोपर्यंत येथे येत नाही तोपर्यंत आम्ही येथून बाहेर जाणार नाही, असा पवित्रा सातव यांनी घेतल्यावर हे प्रकरण चिघळणार, असे लक्षात आल्यावर पहाटे सातव यांना सोडून देण्यात आले.संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली तोडफोडखा. सातव यांना झालेल्या मारहाणीचे हिंगोली जिल्ह्यात पडसाद उमटले. संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिंगोली जिल्ह्यात पंतप्रधानांचे प्रतीकात्मक पुतळे जाळले, बस फोडल्या. औंढ्यात भाजपा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. प्रत्युत्तरात भाजपा कार्यकर्त्यांनीही सातव यांचे कार्यालय फोडले. परभणीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन केले.नेमके काय घडले गुजरातमध्ये?काँग्रेस उमेदवार इंद्रनील राजगुरू यांच्या भावाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ राजगुरू यांनी मुख्यमंत्री रुपाणी यांच्या घरासमोर धरणे धरले. त्यावरून पोलिसांनी त्यांना अटक केली. राजगुरू यांना सोडा, या मागणीसाठी खा. सातव पोलिसांकडे गेले, मात्र त्यांना व सोबतच्या कार्यकर्त्यांनाच पोलिसांनी मारहाण केली.मी गेले सहा महिने गुजरातमध्ये प्रचार करीत असून खासदार आहे, याची कल्पना असतानाही पोलिसांनी हेतूत: मला व माझ्या सोबतच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. मुख्यमंत्री रुपाणी यांना पराभव समोर दिसत असल्याने ते सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत आहेत.- राजीव सातव, खासदार, काँग्रेस(हिंगोली लोकसभा मतदारसंघ)

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017