शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

“देशातील निवडणूक प्रक्रिया सदोष, पारदर्शीपणे काम करणे ECचे कर्तव्य”; राहुल गांधींनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 14:30 IST

Congress MP Rahul Gandhi News: विरोधी पक्षाच्या प्रत्येक सदस्याने देशाची निवडणूक प्रक्रिया सदोष असल्याचे लक्षात ठेवावे, असे राहुल गांधी म्हणाले.

Congress MP Rahul Gandhi News: देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाचा  २४ अकबर रोड हा पत्ता आता बदलला आहे. ४६ वर्षांनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचे नव्या ठिकाणी स्थलांतर झाले असून, मुख्यालयाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. आता काँग्रेसच्या मुख्यालयाचा नवा पत्ता हा ९-ए कोटला रोड, नवी दिल्ली हा असेल. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याह पक्षाचे इतर दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित करताना अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य केले.

महाराष्ट्र आणि हरयाणा येथील विधानसभा निवडणुकांचा दाखला देताना राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. देशातील निवडणूक प्रक्रियेत अतिशय गंभीर दोष आहेत. पारदर्शकता राहिलेली नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने पारदर्शीपणे काम करणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. 

काँग्रेस पक्ष केवळ भाजपा, RSS विरोधात नाही, तर व्यवस्थेविरोधातही लढत आहे

आपल्या देशातील निवडणुका निष्पक्षपातीपणे लढल्या जात आहेत, या भ्रमात राहू नका. काँग्रेस पक्ष केवळ भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातच लढा देत आहे, असा तुमचा समज असेल, तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. देशातील जवळपास सगळ्या संस्थांवर त्यांनी कब्जा केला आहे, आम्ही त्या व्यवस्थेविरोधातही लढत आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत. आम्ही आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत नाराज आहोत. महाराष्ट्र आणि विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्यांची माहिती देणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे, पण ती देण्यास नकार दिला जात आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. 

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोग मतदार याद्या पारदर्शक करण्यास का नकार देत आहे? आम्हाला यादी न देण्याचा कारण काय आहे? पारदर्शीपणे काम करणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. विरोधी पक्षाच्या प्रत्येक सदस्याने देशाची निवडणूक प्रक्रिया सदोष असल्याचे लक्षात ठेवावे, असे राहुल गांधी म्हणाले.

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस