शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

“देशातील निवडणूक प्रक्रिया सदोष, पारदर्शीपणे काम करणे ECचे कर्तव्य”; राहुल गांधींनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 14:30 IST

Congress MP Rahul Gandhi News: विरोधी पक्षाच्या प्रत्येक सदस्याने देशाची निवडणूक प्रक्रिया सदोष असल्याचे लक्षात ठेवावे, असे राहुल गांधी म्हणाले.

Congress MP Rahul Gandhi News: देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाचा  २४ अकबर रोड हा पत्ता आता बदलला आहे. ४६ वर्षांनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचे नव्या ठिकाणी स्थलांतर झाले असून, मुख्यालयाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. आता काँग्रेसच्या मुख्यालयाचा नवा पत्ता हा ९-ए कोटला रोड, नवी दिल्ली हा असेल. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याह पक्षाचे इतर दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित करताना अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य केले.

महाराष्ट्र आणि हरयाणा येथील विधानसभा निवडणुकांचा दाखला देताना राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. देशातील निवडणूक प्रक्रियेत अतिशय गंभीर दोष आहेत. पारदर्शकता राहिलेली नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने पारदर्शीपणे काम करणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. 

काँग्रेस पक्ष केवळ भाजपा, RSS विरोधात नाही, तर व्यवस्थेविरोधातही लढत आहे

आपल्या देशातील निवडणुका निष्पक्षपातीपणे लढल्या जात आहेत, या भ्रमात राहू नका. काँग्रेस पक्ष केवळ भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातच लढा देत आहे, असा तुमचा समज असेल, तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. देशातील जवळपास सगळ्या संस्थांवर त्यांनी कब्जा केला आहे, आम्ही त्या व्यवस्थेविरोधातही लढत आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत. आम्ही आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत नाराज आहोत. महाराष्ट्र आणि विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्यांची माहिती देणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे, पण ती देण्यास नकार दिला जात आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. 

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोग मतदार याद्या पारदर्शक करण्यास का नकार देत आहे? आम्हाला यादी न देण्याचा कारण काय आहे? पारदर्शीपणे काम करणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. विरोधी पक्षाच्या प्रत्येक सदस्याने देशाची निवडणूक प्रक्रिया सदोष असल्याचे लक्षात ठेवावे, असे राहुल गांधी म्हणाले.

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस