शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

“भाजपा सत्तेत असताना अल्पसंख्यांक अन् मुस्लिमांवर अधिक हल्ले”; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 20:15 IST

Rahul Gandhi News: भारताच्या सांप्रदायिकतेवरील हल्ला हा संविधानावरील हल्ला आहे. भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही द्वेषाच्या विरोधातील लढाई जिंकू, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

Rahul Gandhi News: बीफ नेत असल्याच्या संशयावरून एका ज्येष्ठ नागरिकाला पाच-सहा तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना धुळे-मुंबई एक्स्प्रेसमध्ये घडली. तसेच हरियाणा येथील चरखी-दादरी येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक्सवर एक पोस्ट करत काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच भाजपा सत्तेत असताना अल्पसंख्यांक अन् मुस्लिमांवर अधिक हल्ले होत आहेत, असा मोठा आरोपही केला आहे. 

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये खासदार राहुल गांधी म्हणतात की, द्वेषाचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करून सत्तेच्या शिडीवर चढलेले लोक देशभरात सतत भीतीचे वातावरण प्रस्थापित करत आहेत. जमावाच्या रूपात लपलेले द्वेषी घटक कायद्याला आव्हान देत जाहीरपणे हिंसाचार पसरवत आहेत. या उपद्रवी घटकांना भाजपा सरकारकडून मोकळे रान देण्यात आले आहे. त्यामुळेच त्यांनी हे असे धाडस दाखवले आहे. अल्पसंख्याकांवर विशेषत: मुस्लिमांवर सातत्याने हल्ले होत असून सरकारी यंत्रणा मूकपणे या सगळ्या गोष्टी केवळ पाहत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

पुढे आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, अराजक पसरवणाऱ्या बेशिस्त घटकांवर कडक कारवाई करून कायद्याचे राज्य प्रस्थापित केले पाहिजे. भारताच्या सांप्रदायिक एकतेवर आणि भारतीय लोकांच्या हक्कांवर कोणताही हल्ला हा संविधानावरील हल्ला आहे, जो आम्ही अजिबात सहन करणार नाही. भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी द्वेषाच्या विरोधात भारताची एकजूट करण्याची ही ऐतिहासिक लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस