शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

“भाजपा सत्तेत असताना अल्पसंख्यांक अन् मुस्लिमांवर अधिक हल्ले”; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 20:15 IST

Rahul Gandhi News: भारताच्या सांप्रदायिकतेवरील हल्ला हा संविधानावरील हल्ला आहे. भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही द्वेषाच्या विरोधातील लढाई जिंकू, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

Rahul Gandhi News: बीफ नेत असल्याच्या संशयावरून एका ज्येष्ठ नागरिकाला पाच-सहा तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना धुळे-मुंबई एक्स्प्रेसमध्ये घडली. तसेच हरियाणा येथील चरखी-दादरी येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक्सवर एक पोस्ट करत काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच भाजपा सत्तेत असताना अल्पसंख्यांक अन् मुस्लिमांवर अधिक हल्ले होत आहेत, असा मोठा आरोपही केला आहे. 

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये खासदार राहुल गांधी म्हणतात की, द्वेषाचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करून सत्तेच्या शिडीवर चढलेले लोक देशभरात सतत भीतीचे वातावरण प्रस्थापित करत आहेत. जमावाच्या रूपात लपलेले द्वेषी घटक कायद्याला आव्हान देत जाहीरपणे हिंसाचार पसरवत आहेत. या उपद्रवी घटकांना भाजपा सरकारकडून मोकळे रान देण्यात आले आहे. त्यामुळेच त्यांनी हे असे धाडस दाखवले आहे. अल्पसंख्याकांवर विशेषत: मुस्लिमांवर सातत्याने हल्ले होत असून सरकारी यंत्रणा मूकपणे या सगळ्या गोष्टी केवळ पाहत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

पुढे आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, अराजक पसरवणाऱ्या बेशिस्त घटकांवर कडक कारवाई करून कायद्याचे राज्य प्रस्थापित केले पाहिजे. भारताच्या सांप्रदायिक एकतेवर आणि भारतीय लोकांच्या हक्कांवर कोणताही हल्ला हा संविधानावरील हल्ला आहे, जो आम्ही अजिबात सहन करणार नाही. भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी द्वेषाच्या विरोधात भारताची एकजूट करण्याची ही ऐतिहासिक लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस