शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

“भाजपा सत्तेत असताना अल्पसंख्यांक अन् मुस्लिमांवर अधिक हल्ले”; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 20:15 IST

Rahul Gandhi News: भारताच्या सांप्रदायिकतेवरील हल्ला हा संविधानावरील हल्ला आहे. भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही द्वेषाच्या विरोधातील लढाई जिंकू, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

Rahul Gandhi News: बीफ नेत असल्याच्या संशयावरून एका ज्येष्ठ नागरिकाला पाच-सहा तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना धुळे-मुंबई एक्स्प्रेसमध्ये घडली. तसेच हरियाणा येथील चरखी-दादरी येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक्सवर एक पोस्ट करत काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच भाजपा सत्तेत असताना अल्पसंख्यांक अन् मुस्लिमांवर अधिक हल्ले होत आहेत, असा मोठा आरोपही केला आहे. 

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये खासदार राहुल गांधी म्हणतात की, द्वेषाचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करून सत्तेच्या शिडीवर चढलेले लोक देशभरात सतत भीतीचे वातावरण प्रस्थापित करत आहेत. जमावाच्या रूपात लपलेले द्वेषी घटक कायद्याला आव्हान देत जाहीरपणे हिंसाचार पसरवत आहेत. या उपद्रवी घटकांना भाजपा सरकारकडून मोकळे रान देण्यात आले आहे. त्यामुळेच त्यांनी हे असे धाडस दाखवले आहे. अल्पसंख्याकांवर विशेषत: मुस्लिमांवर सातत्याने हल्ले होत असून सरकारी यंत्रणा मूकपणे या सगळ्या गोष्टी केवळ पाहत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

पुढे आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, अराजक पसरवणाऱ्या बेशिस्त घटकांवर कडक कारवाई करून कायद्याचे राज्य प्रस्थापित केले पाहिजे. भारताच्या सांप्रदायिक एकतेवर आणि भारतीय लोकांच्या हक्कांवर कोणताही हल्ला हा संविधानावरील हल्ला आहे, जो आम्ही अजिबात सहन करणार नाही. भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी द्वेषाच्या विरोधात भारताची एकजूट करण्याची ही ऐतिहासिक लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस