शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
2
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
3
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
4
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
5
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
6
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
7
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
8
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
9
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
10
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
11
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
12
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
13
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
14
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
15
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
16
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
17
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
18
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
19
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
20
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 

दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा, काँग्रेस नेत्यानं काश्मीर-बांगलादेशचा संबंध जोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 11:13 IST

कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा आपली दहशत निर्माण करण्यासाठी सामान्य नागरिकांना निशाणा बनवले आहे. यात सर्व जण बिगर मुस्लीम होते.

नवी दिल्ली - काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी (Manish Tewari) यांनी रविवारी एक ट्विट केले आहे. दक्षिण आशियात एक मोठा इस्लामीक अजेंडा काम करत असल्याचे म्हणत, त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जम्मू-काश्मिरात मुस्लिमेतरांच्या हत्या, काश्मीरमध्ये सैनिकांचे बलिदान आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार, या सर्व घटनांचा संबंध एकमेकांशी जोडत, त्यांनी हे ट्विट केले आहे. (A larger pan Islamist agenda at work in South Asia - Manish Tewari)

तिवारी म्हणाले, काश्मीरमध्ये बिगर मुस्लिमांची हत्या, बांगलादेशात हिंदूंची हत्या आणि पुंछमध्ये 9 जवानांचे हौतात्म्य यात काही संबंध आहे का? कदाचित असे आहे. दक्षिण आशियात एक मोठा इस्लामिक अजेंडा काम करत आहे.

कश्मिरात आठवड्याभरात 9 जवानांना हौतात्म्य -जम्मू-काश्मिरात अँटी-टेरर ऑपरेशनमध्ये (Anti Terror Operation) 9 जवान शहीद झाले आहेत. गेल्या सोमवारपासून आतापर्यंत दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत 9 जवानांना हौतात्म्य आले आहे. गेल्या आठवड्यात पुंछमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या एका चकमकीत 5 जवानांना हौतात्म्य आले. यानंतर, 14 ऑक्टोबरला आणखी एका चकमकीत दोन जवानांना हौतात्म्य आले होते.

काश्मिरात मुस्लिमेतरांवरांवर हल्ले -कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा आपली दहशत निर्माण करण्यासाठी सामान्य नागरिकांना निशाणा बनवले आहे. यात सर्व जण बिगर मुस्लीम होते. या दहशतवाद्यांनी केवळ 5 दिवसांतच 7 सामान्य नागरिकांची हत्या केली. तेव्हापासूनच सुरक्षादलाच्या जवानांनी दहशतवाद्यांविरोधत ऑपरेशन सुरू केले आहे. 

बांगलादेशातही धार्मिक हिंसाचार -बांगलादेशातही  हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांना निशाना बनवण्यात येत आहे. एका अफवेनंतर तेथे सर्वप्रथम एका दुर्गापुजा पेंडॉलवर हल्ला करण्यात आला आणि हिंदू देवतेच्या मूर्ती तोडण्यात आल्या. तेथे अनेक जिल्ह्यांत तणावाची परिस्थिती आहे. तेथील नवाखली येथे शुक्रवारी नमाननंतर जमावाने इस्कॉन मंदिरावर हल्ला केला होता. यावेळी श्रद्धाळूंना मारहाणही करण्यात आली. या हल्ल्यात एकाचा मृत्यूही झाला होता. आतापर्यंत, येथील धार्मिक हिंसाचारात मरणारांची संख्या 6 वर पोहोचली आहे. 200 हून अधिक हिंदू श्रद्धाळू जख्मी झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा -- बांगलादेशात हिंदूंविरोधात मोठा हिंसाचार, मंदिरांमध्ये तोडफोड; 6 जणांचा मृत्यू

टॅग्स :congressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरBangladeshबांगलादेशterroristदहशतवादीIslamइस्लामMuslimमुस्लीम