शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

'या' राज्यात कमळ कोमेजण्याची शक्यता; सत्ता जाणार काँग्रेसच्या 'हाता'त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 08:01 IST

विधानसभेचा राजीनामा देणारे तीन भाजप आमदार काँग्रेसमध्ये सामील

इम्फाळ : चार मंत्र्यांसह भाजपप्रणीत आघाडीच्या नऊ सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर मणिपुरात वेगाने राजकीय घडामोडी घडत असून, काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस लवकरच एन. बिरेन सिंह सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणणार आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते ओ. इबोबी सिंह यांनी सांगितले.विधानसभेचा राजीनामा देणारे तीन भाजप आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी भाजपप्रणीत आघाडी सरकारचा राजीनामा दिलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या चार मंत्र्यांशी संपर्क साधण्यात आला आहे, असे इबोबी सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.आम्हाला आणि आमच्या पक्षाला योग्य वागणूक न दिल्याने सरकारचा राजीनामा दिल्याचे चार मंत्र्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री इबोबी सिंह यांनी सांगितले की, राज्य सरकारविरुद्ध काँग्रेस अविश्वास ठराव आणणार असून, विधानसभेचे विशेष अधिवेशन लवकर बोलाविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष युमनाम खेमचंद सिंह यांची मी भेट घेणार आहे. दरम्यान, काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष वाय. खेमचंद यांंना हटवण्यासाठी नोटीस दिली आहे.सापत्न वागणुकीमुळे मी अािण एनपीपीच्या तीन सहकाऱ्यांनी मणिपूरमधील भाजपप्रणीत आघाडी सरकारचा राजीनामा दिला, असे माजी उपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार यांनी सांगितले. नवीन सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देणार का? यावर ते म्हणाले की, आम्ही हा पर्याय पडताळून पाहणार असून, अविश्वास ठराव मांडल्यानंतर आम्ही निश्चितच सरकार स्थापन करू.१९ जून रोजी मणिपूरमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होणार असताना या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजप आणि काँग्रेसने राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी उमेदवार दिले आहेत.विधानसभेत असे आहे संख्याबळउपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार सिंह, आदिवासी आणि पर्वतीय क्षेत्र विकासमंत्री एन. कायिशी, युवक कल्याणमंत्री लेतपाओ हाओकीप आणि आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री एल. जयंत कुमार सिंह यांनी बुधवारी मंत्रीपदाचे राजीनामा दिले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या एका आमदाराने आणि एका अपक्ष आमदारानेही सरकारचा पाठिंबा काढला आहे.विरोधकांचे संख्याबळ २९२० काँग्रेस, ४ एनपीपी, ३ भाजप आणि तृणमूल काँग्रेस आणि एक अपक्ष आमदाराचा समावेश आहे.बिरेन सिंह यांच्या मागे २३१८ भाजप , ४ एनपीएफ, एक लोजपा जणांचे पाठबळ आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा