शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस मंत्र्यांनी घेतली सोनिया व राहुल गांधींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 04:14 IST

काँग्रेसचा जनाधार वाढविण्याचे मंत्र्यांना निर्देश; किमान समान कार्यक्रमानुसार राहणार वाटचाल

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेसचा जनाधार वाढविण्यासोबत जनतेचे प्रश्न सोडवा, असा सल्ला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नवनियुक्त मंत्र्यांना दिला.मंत्रिमंडळात सोमवारी समाविष्ट झाल्यानंतर काँग्रेसचे सर्व दहाही मंत्र्यांनी रात्रीच दिल्ली गाठली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सुनील केदार, के. सी. पाडवी, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजीत कदम, अमित देशमुख, असलम शेख व वर्षा गायकवाड यांनी तुघलक रोडवरील राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली.यावेळी राहुल गांधी यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच काँग्रेसचा जनाधार पुन्हा महाराष्ट्रात मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला आहे. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस चौथ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे.किमान समान कार्यक्रमानुसार तसेच काँग्रेसचे धोरणे राबविण्यासाठी प्रत्येक मंत्र्यांनी काही जिल्ह्यांची जबाबदारी घ्यावी, अशी सूचना राहुल गांधी यांनी केली.राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सर्वच मंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची सदिच्छा भेट घेतली. यानंतर सर्व मंत्र्यांनी अ. भा. काँग्रेस समितीच्या मुख्यालयात येऊन संघटनेतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. यावेळी पक्षाचे प्रभारी मल्लिाकार्जुन खरगे, महासचिव के. सी. वेणुगोपल, सरचिटणीस मुकुल वासनिक यांची या मंत्र्यांनी भेट घेतली.जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य -थोरातया भेटीनंतर काँग्रेस मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेसची यापुढील वाटचाल ही किमान समान कार्यक्रमानुसार राहणार आहे. यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे.महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविले जाणार आहे. याबद्दल काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांना विश्वास दिला आहे.विरोधकांकडे मुद्दे नाहीत -चव्हाणमहाविकास आघाडीचे सरकार राज्याच्या विकासासाठी निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने ते याकुब मेमनच्या फाशीचे मुद्दे उपस्थित करीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना केला.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAshok Chavanअशोक चव्हाणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार