शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात', काँग्रेसच्या बैठकीतून खरगेंचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 15:31 IST

Congress Meeting : आज काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे सर्व सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक पार पडली.

Congress Meeting : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता काँग्रेसने (Congress) आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर आज(दि.13) राजधानी दिल्लीत पक्ष मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस, प्रदेश प्रभारी आणि राज्यांच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi), केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 

कोणत्या विषयावर चर्चा झाली?मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत संघटना मजबूत करणे, आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी, जात जनगणनेची मागणी आणि एससी-एसटी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा झाली. राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांकडून त्यांची मते, सूचना आणि पक्षाची राज्यांतील परिस्थितीबाबत प्रतिक्रिया घेतल्या.या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही या वर्षी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसची ही बैठक महत्वाची मानली जात आहे. 

गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात झाला : खरगेया बैठकीनंतर काँग्रेस मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर बेरोजगारी, महागाई आणि संविधानाच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला. देशातील गरीब आणि मध्यमवर्गाचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, सेबी आणि अदानी यांच्यातील संबंधाचे धक्कादायक खुलासे झाले आहे, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशीची गरज आहे. छोट्या गुंतवणूकदारांचा पैसा शेअर बाजारात धोक्यात घालता येत नाही. मोदी सरकारने तात्काळ सेबी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करावी आणि या संदर्भात JPC (संयुक्त संसदीय समिती) स्थापन करावी.

जात जनगणनेची लोकांची मागणीते पुढे म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी मिळावी, या मागणीसाठी काँग्रेस पक्ष आपला लढा सुरूच ठेवणार आहे. देशातील तरुणांवर लादलेली अग्निपथ योजना सरकारने रद्द करावी. रेल्वे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, गाड्या रुळावरून घसरणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. हवामान-संबंधित आपत्ती आणि ढासळत चाललेल्या पायाभूत सुविधा ही देखील चिंतेची कारणे आहेत. या प्रश्नांवर राष्ट्रीय मोहीम तयार करून लोकांपर्यंत जाणार असल्याचे खरगे यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधी