शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात', काँग्रेसच्या बैठकीतून खरगेंचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 15:31 IST

Congress Meeting : आज काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे सर्व सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक पार पडली.

Congress Meeting : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता काँग्रेसने (Congress) आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर आज(दि.13) राजधानी दिल्लीत पक्ष मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस, प्रदेश प्रभारी आणि राज्यांच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi), केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 

कोणत्या विषयावर चर्चा झाली?मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत संघटना मजबूत करणे, आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी, जात जनगणनेची मागणी आणि एससी-एसटी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा झाली. राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांकडून त्यांची मते, सूचना आणि पक्षाची राज्यांतील परिस्थितीबाबत प्रतिक्रिया घेतल्या.या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही या वर्षी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसची ही बैठक महत्वाची मानली जात आहे. 

गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात झाला : खरगेया बैठकीनंतर काँग्रेस मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर बेरोजगारी, महागाई आणि संविधानाच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला. देशातील गरीब आणि मध्यमवर्गाचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, सेबी आणि अदानी यांच्यातील संबंधाचे धक्कादायक खुलासे झाले आहे, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशीची गरज आहे. छोट्या गुंतवणूकदारांचा पैसा शेअर बाजारात धोक्यात घालता येत नाही. मोदी सरकारने तात्काळ सेबी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करावी आणि या संदर्भात JPC (संयुक्त संसदीय समिती) स्थापन करावी.

जात जनगणनेची लोकांची मागणीते पुढे म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी मिळावी, या मागणीसाठी काँग्रेस पक्ष आपला लढा सुरूच ठेवणार आहे. देशातील तरुणांवर लादलेली अग्निपथ योजना सरकारने रद्द करावी. रेल्वे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, गाड्या रुळावरून घसरणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. हवामान-संबंधित आपत्ती आणि ढासळत चाललेल्या पायाभूत सुविधा ही देखील चिंतेची कारणे आहेत. या प्रश्नांवर राष्ट्रीय मोहीम तयार करून लोकांपर्यंत जाणार असल्याचे खरगे यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधी