शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

२ एप्रिल रोजी काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा; शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी प्रमुख मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 05:10 IST

शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी हे काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातील मुख्य मुद्दे असतील. या या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यांचा जाहीरानाम्यात समावेश करण्यात आला असून, २ एप्रिल रोजी काँग्रेस निवडणूक जाहीरनामा जारी करणार आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी हे काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातील मुख्य मुद्दे असतील. या या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यांचा जाहीरानाम्यात समावेश करण्यात आला असून, २ एप्रिल रोजी काँग्रेस निवडणूक जाहीरनामा जारी करणार आहे.उच्चपदस्थ सूत्रांनुसार बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर मुख्यत्वे भर देत काँग्रेसच्या सर्व प्रवक्त्यांनी चर्चेत आवर्जून हे दोन्ही मुद्दे मांडून या दोन्ही मुद्यांवर भाजपाला बोलण्यास भाग पाडण्यास विवश करावे, अशा स्पष्ट सूचना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्या आहेत. या सूचेननुसार जाहीरनामा जारी होण्याआधीच काँग्रेस बेरोजगारीच्या मुद्यांवर मोदी सरकारवर निशाणा साधत आहे.मोदी यांना रोजगार विनाशक पंतप्रधान, असे संबोधत माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेशा यांनी मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. २०१८ मध्ये मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे एक कोटी नोकºयाच गायब झाल्या. सरकारी आकडेवारी सादर करून मुद्रा योजनेतहत रोजगार निर्माण झाल्याचा मोदी यांचा दावाही दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०१७-१८ मध्ये मुद्रा योजनेतहत २४,८४० रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. एवढ्या कमी रकमेत कोणता व्यवसाय सुरू करता येतो. यातून एकही रोजगार निर्माण होऊ शकत नाही. दोन टक्के कर्ज पाच लाखांचे होते. मुद्रा योजनेचे तीन वर्ग आहेत. यात शिशू, किशोर आणि तरुण वर्गाचा समावेश आहे. शिशू योजनेतहत देण्यात आलेल्या ८८ टक्के कर्जाची रक्कम २,४८,४० रुपये होती.आकडेवारी गुलदस्त्यातपंतप्रधान मोदी आणि त्यांचे सरकार आकडेवारी लपवीत आहे. ही आकडेवारी जाहीर झाल्यास सरकारचा फोलपणा उघड होईल. सरकारचा दावा खरा मानल्यास ४५ वर्षांत सर्वाधिक बेरोजगारी मोदी सरकारच्या काळात झाली. निती आयोगाने श्रम विभागाकडन २१ फेब्रुवारी २०१९ रोजी मुद्रा योजनेतहत किती रोजगार निर्माण झाले, याची आकडेवारी मागितली आहे. तथापि, अद्याप सरकारने आणि निती आयोगाने याबाबत खुलासा केलेला नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक