शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Mallikarjun Kharge : "मोदी सरकार बेरोजगारीवर बोलत नाही, 10 वर्षांत भाजपाने 411 आमदारांना...", खरगेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 12:09 IST

Mallikarjun Kharge Slams Narendra Modi : मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मोदी सरकार बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यपूर्व काळाबद्दलच बोलतात. काँग्रेसची सरकारं पाडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "आम्ही बेरोजगारीचा मुद्दा प्रमुख मुद्दा म्हणून मांडत आहोत. यावर भाजपा कधीच बोलत नाही. केरळ, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमध्ये भेदभाव केला जात आहे. देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. गेल्या 10 वर्षांत भाजपाने 411 आमदारांना आपल्याकडे आणलं आहे. त्यांनी काँग्रेसची अनेक सरकारं पाडली. भाजपा लोकशाही संपवत आहे."

"पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा संसदेत बोलतात तेव्हा ते त्यांच्या सरकारच्या यशाबद्दल बोलतात. पण आपल्या सरकारच्या अपयशाबद्दल बोलत नाहीत. जेव्हा आपण त्यांच्या अपयशाबद्दल बोलतो तेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. यामुळेच आम्ही त्यांच्या सरकारच्या विरोधात काळी पत्रिका आणली आहे, जेणेकरून जनतेला त्यांच्या सरकारच्या अपयशाची माहिती मिळेल."

"देशातील सर्वात मोठा मुद्दा बेरोजगारीचा आहे, मात्र मोदी सरकार त्यावर कधीच बोलत नाही. ते नेहमीच 10 वर्षांची तुलना करतात, पण पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या कर्तृत्वाबद्दल कधीच सांगत नाहीत. ज्या राज्यात भाजपाचं सरकार नाही, तेथे केंद्र सरकार मनरेगाचे पैसेही देत ​​नाही" असंही मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण