शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"इथेही राजकारण"; कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावरुन काँग्रेसची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 15:47 IST

Kargil Vijay Diwas: पंतप्रधान मोदी यांनी कारगिलमध्ये केलेल्या भाषणात अग्निवीर योजनेचा उल्लेख केला आणि विरोधकांवर निशाणा साधला.

Mallikarjun Kharge on Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिवसाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. लडाखमधील १९९९ च्या युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. यावेळी कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी दहशतवाद, जम्मू-काश्मीर, लडाख, अग्निपथ योजना आणि विरोध यावर भाष्य केले. कारगिलमध्ये पंतप्रधान मोदी यांनी अग्निवीर योजनेबाबत भाष्य केल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. कारगिल येथे केलेल्या भाषणावरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. पंतप्रधान कारगिल विजय दिनानिमित्तही तोच खोटेपणा पसरवत असून क्षुद्र राजकारण करत आहेत, अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अग्निवीर योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कारगिलमध्ये केलेल्या भाषणात अग्निवीर योजनेचा उल्लेख केला आणि विरोधकांवर निशाणा साधला.

"लष्करातील सुधारणांना आमचे पहिले प्राधान्य आहे. अग्निपथ योजना हा त्याचाच एक भाग आहे. अनेक दशकांपासून लष्कराला तरुण बनविण्यावर संसदेत चर्चा होत होती. अनेक समित्यांमध्ये हा विषय मांडण्यात आला, मात्र हा बदल करण्याची इच्छाशक्ती यापूर्वी दाखवली गेली नाही. पण सत्य हे आहे की अग्निपथ योजनेमुळे देशाची ताकद वाढेल आणि देशातील कर्तबगार तरुणही मातृभूमीच्या सेवेसाठी पुढे येतील. पेन्शनचे पैसे वाचवण्यासाठी सरकारने ही योजना आणली असल्याचा भ्रम विरोधक पसरवत आहेत. अशा लोकांच्या विचारांची मला लाज वाटते," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या टीकेनंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खरगे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर याबाबत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारण करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

"आजवर कोणत्याही पंतप्रधानाने असे केले नाही. पंतप्रधान मोदी म्हणत आहेत की त्यांच्या सरकारने अग्निपथ योजना लष्कराच्या सांगण्यावरून राबवली  हे पूर्णपणे खोटे आहे. याशिवाय हे आपल्या लष्करी दलांचाही अपमान करणारे आहे. माजी लष्करप्रमुख निवृत्त जनरल एमएम नरवणे यांनी रेकॉर्डवर म्हटले आहे की अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेले ७५ टक्के तरुण कायमस्वरूपी होतील. तर २५ टक्के चार वर्षांनंतर काढले जातील. पण मोदी सरकार नेमके उलटे करत आहे," असं खरगे म्हणाले.

"मोदी सरकारने तिन्ही सैन्य दलांसाठी अग्निपथ योजना सक्तीने लागू केली. एमएम नरवणे यांनी याबाबत एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी अग्निपथ योजना लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी हे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. पण मोदी सरकार हे पुस्तक प्रकाशित करू देत नाहीये. केवळ सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन आपण व्यावसायिक सैनिक तयार करत आहोत का? सैनिक पैसे कमावण्यासाठी नव्हे तर देशभक्तीसाठी सैन्यात भरती होतात," असेही खरगे म्हणाले. 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनNarendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेस