शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

काँग्रेसने अनेक जागांचा मोह सोडला; ७० जागा दिल्या मित्रपक्षांना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 09:04 IST

‘इंडिया’चा पुढील मार्ग होतोय सोपा; अनेक ठिकाणी भाजपसमोर एकच तगडा उमेदवार; अंतर्गत नाराजी दूर करणार

नवी दिल्ली : इंडिया आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा निर्णय वेगाने घेतला जात आहे. २०१९ मध्ये काँग्रेसने लढवलेल्या जागांचे ‘बलिदान’ हे बऱ्याच अंशी त्याचे कारण आहे. यावरून काँग्रेसमध्ये काहीशी अंतर्गत नाराजी आहे, पण भाजपविरोधात लढण्यासाठी पक्षाकडे दुसरा पर्यायही नाही.

  काँग्रेसने अधिक जागांवर निवडणूक लढवण्याचा मोह सोडला तरच ही आघाडी यशस्वी होऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले. काँग्रेसने २०१९ मध्ये लढलेल्या जागा मित्रपक्षांना देण्यास सुरुवात करताच जागावाटप सोपे झाले आहे.

महाराष्ट्रात काय? - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८पैकी २५ जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते. - यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि प्रकाशआंबेडकर यांच्या पक्षाशी युती झाल्यामुळे काँग्रेसला२५ जागा मिळणे कठीण आहे. - येथेही काँग्रेसला काही जागा सोडाव्या लागतील. 

नेत्यांची समजूत काढावी लागणारकाँग्रेसने आपल्या जागा सोडण्याची तयारी दर्शविली असली तरीही तेथे लढाईच्या तयारीत असलेल्या नेत्यांची समजूत काढण्याचे आव्हान आहे. काही नेत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

कुठे होईल फायदा? तामिळनाडू आणि बिहारमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला मित्रपक्षांपेक्षा एक ते दोन जास्त जागा मिळू शकतात. त्यामुळे तेथे फायदा होण्याची शक्यता आहे.

मित्रपक्षांना फायदाकाँग्रेसने २०१९ मध्ये ४२१ जागा लढवल्या, त्यापैकी फक्त ५२ जागा जिंकल्या होत्या. यामुळे भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी काँग्रेसला मतांचे विभाजन रोखण्याची रणनीती अवलंबावी लागली आहे.त्यामुळेच काँग्रेसने पक्षांशी  आघाडी केली. काँग्रेसने मित्रपक्षांसह ६ राज्यांत १२६ जागांचे वाटप करत एकच उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आहे.यात काँग्रेसने मित्रपक्षांसाठी ७० जागांचे ‘बलिदान’ दिले आहे. बिहार, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि झारखंडमधील १४० जागांसाठी एकच उमेदवार देण्यावरही लवकरच निर्णय होणार आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी